शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

जालना : शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. बेमोसमी पाऊस होत ...

जालना : शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. बेमोसमी पाऊस होत असल्याने सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता पुन्हा दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी जमा होत असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहे.

भरती तत्काळ करण्याची मागणी

जालना : गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रकरण महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसून, परीक्षांच्या तारखांविषयी फक्त चालढकल केली जात आहे. शासनाने स्पर्धा परीक्षांसह पोलीस भरती तत्काळ करावी, अशी मागणी अखिल भारती विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर प्रथमेश कुलकर्णी, समाधान कुबेर, रामदास बरसाले, आंदोलन प्रमुख तुषार सैबी, अभिषेक आडेप आदींची नावे नमूद करण्यात आली आहे.

शिक्षकांची पोलीस ठाण्यात धाव

जालना : पात्र असतानाही पंधरा वर्षापासून शाळांचे अनुदान मंजूर न करता, खोटी आश्वासने देऊन, दिरंगाई करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांसह शिक्षक आमदार, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी शिक्षक विजय सुरासे, शंकर शेरे, ओम एखंडे, बाळू शिंदे, संदीप इंगोले, प्रताप नागरे, सारिका गायके, अर्पणा लामतुरे आदींची उपस्थिती होती.

धावडा येथील वीजपुरवठा सुरळीत

धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील झोपडपट्टी परिसरातील रोहित्राचे गट्टू दोन आठवड्यापासून जळाल्याने परिसरात अंधार होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरू होती. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी रविवारी नवीन गट्टू बसवून सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत केला आहे. समतानगर भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी येथील वीज कर्मचाऱ्यांनी शेतातील थ्री फेज रोहित्रावरून वीज जोडणी केली.