शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

पान चारचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

वालसावंगी : दिवसा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जागावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले ...

वालसावंगी : दिवसा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जागावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहे. मात्र, दिवसा वीज टिकत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात मुक्कामी राहावे लागत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना घरबसल्या धडे

भोकरदन : कोरोनामुळे शाळांचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. ज्या पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा साधे मोबाईल आहेत. अशा विद्यार्थांच्या घरी जाऊन भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दररोज शिकवणी देत आहेत. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे. यासाठी शिक्षक जी.एस. इंगळे, यु. एम. पालकर, कंकाळ, पैठणकर आदी परिश्रम घेत आहेत.

शहरातील लोखंडी पुलावर वाहतुकीचा फज्जा

जालना : जुना आणि नवीन जालन्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानंतर तेथे नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या पुलावरील सर्व वाहतूक छोट्या पुलावरून सुरू आहे. या पुलाची क्षमता एकेरी वाहतुकीची आहे. परंतु, पुलाचा जवळचा मार्ग असल्याने दुचाकीसह तीनचाकी, चारचाकी वाहने या पुलावरूनच ये-जा करीत आहे. त्यामुळे पुलावर वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

जालना जिल्ह्यात तापमानात घट

जालना : यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात चांगला आणि दमदार पाऊस झाल्याने यंदा थंडीत वाढ झाली आहे. रविवारी सकाळी १० अंश तर दुपारी १३ अंश तापमान नोंदवले गेले. संपूर्ण आठवड्यातील तापमानापेक्षा रविवारच्या तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. दिवसभर वातावरणात गारवा असल्याने लोकांनी उबदार कपडे परिधान केले तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेतली.

जालन्यात बौध्द वधू-वर परिचय मेळावा

जालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येत्या रविवारी बौध्द समाजातील विवाह इच्छुक तरूण- तरूणींसाठी वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत असणाऱ्या या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. मेळाव्यास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, नगरसेवक राहुल हिवाळे, उपनिरीक्षक संजय बनकर, दिलीप खरात, प्रा. एम.एम. तांबे, प्रा. पोटे, डॉ. कविता अंभोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.

आरएचव्ही समोरील रस्त्याची दुरवस्था

जालना : शहरातील बाबूराव काळे ते जवाहर पोलीस चौकी या दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रहदारीच्या या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

भोकरदन : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. अनेक वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढलेले अपघात पाहता पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बदनापुरात नाल्या तुंबल्या; आरोग्य धोक्यात

बदनापूर : शहरात नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नाल्यांची साफसफाई करण्यात येत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तापासह डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगरपंचायतीने शहर स्वच्छतेबरोबरच औषध फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

परतूर येथे बैठक

परतूर : राज्यातील चर्मकार समाज गेल्या अनेक वर्षांपासून न्याय व हक्कापासून वंचित राहिलेला आहे. या समाजाच्या हक्कासाठी संघटित होऊन लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजू बासनवाल यांनी परतूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.

शेतकरी नाराज

अंबड : तालुक्यातील माहेर भायगाव व रोहिलागड सर्कलमधील शेतकऱ्यांचा मागील वर्षीचा मोसंबी विमा मंजूर झालेला असताना तो वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने तत्काळ विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.

सुविधांची वानवा

भोकरदन : शहरातील काही वसाहतींमध्ये कोणत्याही नागरी सुविधा नसल्याने येथील रहिवासी भौतिक सुविधांपासून वंचित आहेत. यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

काटेरी झुडपे वाढली

अंबड : तालुक्यातील सुखापुरी तलावाला काटेरी झुडपांचा व अनावश्यक झाडांचा विळखा पडलेला आहे. तलावाच्या सुरक्षा भिंतीवर काटेरी झुडपे, गवत असल्याने धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अवैध वाळूचा उपसा

जाफराबाद : तालुक्यातील विविध नदी पात्रातून रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा केला जात आहे. याकडे पोलीस व महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.