शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा- पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:38 IST

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.जालना शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, शामसुंदर कौठाळे, सुरेंद्र गंदम यांच्यासह अधिकारी, समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बैठकीसाठी परशुराम पवार, कैलास जावळे, रवी देशमुख, देवाशीष वर्मा, राधाकिसन जायभाये, कडुबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सोशल मीडियावर टिकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्या दृष्टीने पोलीस दलाच्या वतीनेही सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जमाव करू नये, निकालानंतर कोणीही गुलाल उधळू नये किंवा निषेध करू नये, जातीय अफवा पसरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाAyodhyaअयोध्याCourtन्यायालय