शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

जनगणना झाली तरच आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल : चोथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ...

अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ओबीसी समाजाची ताकद वाढविली पाहिजे. विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना येथे मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार शिवाजी चोथे यांनी केले.

अंबड येथील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात रविवारी ओबीसी परिषद व माजी आमदार राजेश राठोड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार राजेश राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना चोथे म्हणाले की, ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे ही शिवसेनेची भूमिका आहे. लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाचे असून, त्यांच्यासाठी सर्व समाजाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. मराठा व ओबीसीमध्ये द्वेष पसरवणे चुकीचे आहे. ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. कुठेही गालबोट लागू न देता कोणाबद्दल अपशब्दही न बोलता मोर्चा निघाला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काळबांडे यांनी केले. याप्रसंगी आमदार राजेश राठोड म्हणाले की, ओबीसींचा आवाज म्हणून सभागृहांमध्ये आपण प्रश्न मांडणार आहे. ओबीसी समाज हा अन्याय सहन करणारा असून, राजकीय भविष्य अबाधित ठेवायचे असेल तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला याची दखल घेण्यासाठी लाखोंच्या समुदायाने ओबीसी समाज जालना येथील मोर्चात सहभागी होईल, असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर नारायण मुंडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन देवकर यांनी, तर आभार डॉ. रमेश तारगे यांनी मानले. यावेळी समाजाबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.