शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

जनगणना झाली तरच आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल : चोथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ...

अंबड : ओबीसीची जनगणना झाली तरच देशाच्या आर्थिक नियोजनात अठरापगड जातींना वाटा मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ न देता ओबीसी समाजाची ताकद वाढविली पाहिजे. विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना येथे मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार शिवाजी चोथे यांनी केले.

अंबड येथील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात रविवारी ओबीसी परिषद व माजी आमदार राजेश राठोड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार राजेश राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना चोथे म्हणाले की, ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे ही शिवसेनेची भूमिका आहे. लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाचे असून, त्यांच्यासाठी सर्व समाजाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. मराठा व ओबीसीमध्ये द्वेष पसरवणे चुकीचे आहे. ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. कुठेही गालबोट लागू न देता कोणाबद्दल अपशब्दही न बोलता मोर्चा निघाला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काळबांडे यांनी केले. याप्रसंगी आमदार राजेश राठोड म्हणाले की, ओबीसींचा आवाज म्हणून सभागृहांमध्ये आपण प्रश्न मांडणार आहे. ओबीसी समाज हा अन्याय सहन करणारा असून, राजकीय भविष्य अबाधित ठेवायचे असेल तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला याची दखल घेण्यासाठी लाखोंच्या समुदायाने ओबीसी समाज जालना येथील मोर्चात सहभागी होईल, असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर नारायण मुंडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन देवकर यांनी, तर आभार डॉ. रमेश तारगे यांनी मानले. यावेळी समाजाबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.