शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
4
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
5
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
6
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
7
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
8
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
9
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
10
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
11
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
12
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
13
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
14
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
15
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
16
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
17
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
18
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
19
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
20
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा

भरपाईसाठी केवळ २५ कोटींची मागणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:43 IST

बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यानुसार जिरायती, बागायती व फळपिके मिळवून २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले असून, भरपाईपोटी एकूण २५ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे. दरम्यान, ही मदत म्हणजे गारपिटीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे सांगत शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यानुसार जिरायती, बागायती व फळपिके मिळवून २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले असून, भरपाईपोटी एकूण २५ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे. दरम्यान, ही मदत म्हणजे गारपिटीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे सांगत शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मागील महिन्यात ११ फेब्रुवारीला जालना, मंठा, परतूर, जाफराबाद, घनसावंगी व अंबड तालुक्यात अवकाळी पावसासह काही मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या हंगामी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. मोसंबी, द्राक्ष व शेडनेट हाऊसला गारिपीटीचा सर्वाधिक फटका बसला होता. गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पूर्ण केले. या अंतीम अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. जिरायती व बागायत पिकांचे ३३ -५० टक्क्यांपर्यंत जाफराबाद, अंबड व जालना तालुक्यात फळपिकांचे अनुक्रमे ६२६.०९, ६४० व १०७.२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीमध्ये जालना तालुक्यात द्राक्ष बागांचे सर्वाधिक १२०२.०४ हेक्टर क्षेत्राचे व मंठा तालुक्यातील ९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना भरपाई मिळावी यासाठीचा अहवाल पाठविण्यात आल्याचे कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.जिल्ह्यात ३३-५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या जिरायती पिकांना प्रति हेक्टर सहा हजार ८००, बागायती क्षेत्राला तेरा हजार ५०० व फळपिकांना १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या एकूण आठ हजार ३०७.०२ हेक्टर क्षेत्रासाठी दहा कोटी ८० लाख १५ हजार ३३५ रुपयांच्या निधीची गरज आहे. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तेरा हजार ३७२.१५ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी २२ लाख ९३९६ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे.