शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रेल्वे पटरीवर एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

दारू बनविणारा पळाला जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात गूळ मिश्रित दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आल्याचे पाहून ...

दारू बनविणारा पळाला

जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात गूळ मिश्रित दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आल्याचे पाहून दारू तयार करणारा पसार झाल्याची घटना कैकाडी मोहल्ला भागात घडली. कैलास जायभाये यांच्या फिर्यादीवरून रवी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाळूची अवैध वाहतूक तेजीत

जालना : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात अवैध वाळू विक्रीचा व्यवसाय चांगलाच तेजीत सुरू आहे. यातून मिळणाऱ्या चांगल्या कमाईमुळे अनेक गावांतील युवावर्ग अवैध ‌वा‌ळूचा व्यवसाय करीत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरात अ‌वैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. रात्रंदिवस भरधाव अवैध वाळूचे ट्रक व हायवा सुसाट धावत आहे.

रुग्णालयासमोरून दुचाकी लंपास

जालना: अंबड शहरातील चव्हाण हॉस्पिटलसमोर प्रदीप नागोराव धर्माधिकारी यांनी सोमवारी दुपारी दुचाकी उभी केली होती. १५ हजार रुपयेे किमतीची ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही. त्यामुळे धर्माधिकारी यांनी अंबड पोलीस ठाण्यात रविवारी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.

कोरोनामुळे लग्नसराई थंडावली

घनसावंगी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा लग्नसराईवर ही मोठा परिणाम झाला आहे. शासनाने कोरोना निर्बंधामुळे मंगल कार्यालयांना नोटिसा बजावून पंचवीस लोकांनाच परवानगी दिल्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापाडले आहेत. कोरोनामुळे आठवडे बाजार बंद आहे. लग्नाला जास्त लोक जमा न करण्याच्या सूचना आहेत.

व्यापाऱ्यांसाठी २१ एप्रिलला सोमिनार

जालना : भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ व जनरल मर्चन्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील व्यापार करणाऱ्यांसाठी २१ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत मोफत ऑनलाइन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक शांतिलाला मुथ्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.

तीर्थपुरीत संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे संचारबंदी लागू केलेली असतानाही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली असून, कॉर्नर, चौकामध्ये गटागटाने घोळका करून, टवाळ्या करत गप्पांच्या मैफिली पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतकडून देण्यात आला.

अंबड शहरातील स्वच्छता रामभरोसे

अंबड : अंबड शहरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरच जागोजागी कचरा साठला असून, गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग लागले आहे. एकंदरीत नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे येथील स्वच्छता ही रामभरोसेच असल्याचे चित्र सध्या दिसत असून, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित गुत्तेदारास साफसपाईचे बिले देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.