शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

कुपोषणमुक्तीसाठी पोषण बागांची निर्मिती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

जालना : आज ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कुपोषणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी पोषण बागांची निर्मिती ...

जालना : आज ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कुपोषणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी पोषण बागांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले.

पोषण वाटिका महाअभियानाचे उद्घाटन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. त्याचे थेट प्रक्षेपण खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेतीसाहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे हे होते. तर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्न व पोषण विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे यांनीही ऑनलाइन सहभाग नोंदविला. केंद्र सरकारद्वारे सुरू केलेले पोषण अभियान महिलाच यशस्वी करू शकतात. पोषक तृणधान्ये हा आपला पारंपरिक आहार असून, शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिभूषण भगवानराव काळे यांनी केले. यावेळी डॉ. विजय नलावडे, विभागीय वनअधिकारी प्रशांत वरुडे, डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी तर आभार इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.