शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

कर्जच न घेतलेल्यांनीही भरले माफीसाठी अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय संगणक प्रणालीशी माहितीची जुळवाजुळव होत नसलेल्या खात्यांची (अनमॅच्ड डेटा) संख्याही वाढली आहे.कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. तर बँकांनी कर्जदार असलेल्या तीन लाख बारा हजार शेतक-यांनी माहिती आपले सरकार पोर्टलवर अद्ययावत केली होती. कुटुंबनिहाय विचार करता कर्जमाफीसाठी अडीच लाखांवर कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत एक लाख ५१ हजार २०६ शेतकºयांसाठी ९५९ कोटी १३ लाख रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. पैकी एक लाख ११ हजार ३४ शेतक-यांच्या कर्जखात्यात ५९७ कोटी, तीन लाख, ६९ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत शासनाने या शेतक-यांच्या याद्या बँकांमध्ये प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पैकी सुमारे २५ हजारांवर शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांचा आकडा कमी होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता हा आकडा आता ६२ हजार ९०० वर गेला आहे. अनेक शेतक-यांनी कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसताना केवळ कर्जमाफीचा काही लाभ मिळेल का, म्हणून अर्ज केलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा व बँकांचे काम वाढले आहे. शेतक-यांनी आपली माहिती तातडीने बँकेस उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा उपनिबंधक एन. व्ही.आघाव यांनी केले आहे.----------एकापेक्षा अधिक बँकांकडून कर्जकाही शेतक-यांनी दोन ते तीन बँकांकडून पीकक र्ज घेतले आहे. परंतु कर्जमाफी योजनेनुसार कोणत्याही एकाच कर्जखात्यास दीड लाखापर्यंतची माफी मिळणार आहे. माफीसाठी दोन ते तीन बँकांचे अर्ज भरलेल्या शेतकºयांमुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांची संख्या वाढली आहे.-----------व्याज आकारणी परत मिळणार का ?कर्जखात्यावर व्याज न आकारण्याचे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा फायदा अनेक शेतक-यांना होणार आहे. मात्र, ज्या शेतक-यांनी व्याजाची रक्कम भरून कर्जखाते बेबाकी करून घेतले त्यांना बँका व्याजारी रक्कम परत देणार का हा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.