शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

कर्जच न घेतलेल्यांनीही भरले माफीसाठी अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय संगणक प्रणालीशी माहितीची जुळवाजुळव होत नसलेल्या खात्यांची (अनमॅच्ड डेटा) संख्याही वाढली आहे.कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. तर बँकांनी कर्जदार असलेल्या तीन लाख बारा हजार शेतक-यांनी माहिती आपले सरकार पोर्टलवर अद्ययावत केली होती. कुटुंबनिहाय विचार करता कर्जमाफीसाठी अडीच लाखांवर कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत एक लाख ५१ हजार २०६ शेतकºयांसाठी ९५९ कोटी १३ लाख रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. पैकी एक लाख ११ हजार ३४ शेतक-यांच्या कर्जखात्यात ५९७ कोटी, तीन लाख, ६९ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत शासनाने या शेतक-यांच्या याद्या बँकांमध्ये प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पैकी सुमारे २५ हजारांवर शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांचा आकडा कमी होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता हा आकडा आता ६२ हजार ९०० वर गेला आहे. अनेक शेतक-यांनी कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसताना केवळ कर्जमाफीचा काही लाभ मिळेल का, म्हणून अर्ज केलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा व बँकांचे काम वाढले आहे. शेतक-यांनी आपली माहिती तातडीने बँकेस उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा उपनिबंधक एन. व्ही.आघाव यांनी केले आहे.----------एकापेक्षा अधिक बँकांकडून कर्जकाही शेतक-यांनी दोन ते तीन बँकांकडून पीकक र्ज घेतले आहे. परंतु कर्जमाफी योजनेनुसार कोणत्याही एकाच कर्जखात्यास दीड लाखापर्यंतची माफी मिळणार आहे. माफीसाठी दोन ते तीन बँकांचे अर्ज भरलेल्या शेतकºयांमुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांची संख्या वाढली आहे.-----------व्याज आकारणी परत मिळणार का ?कर्जखात्यावर व्याज न आकारण्याचे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा फायदा अनेक शेतक-यांना होणार आहे. मात्र, ज्या शेतक-यांनी व्याजाची रक्कम भरून कर्जखाते बेबाकी करून घेतले त्यांना बँका व्याजारी रक्कम परत देणार का हा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.