शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

जालना/भोकरदन : जालना, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये एकाही इच्छुक उमेदवाराने पहिल्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ...

जालना/भोकरदन : जालना, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये एकाही इच्छुक उमेदवाराने पहिल्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र, अनेक गावांतील पॅनलप्रमुखांकडून अद्यापही उमेदवार अंतिम न झाल्याने पहिल्या दिवशी एकाचाही अर्ज दाखल झाला नसल्याचे चित्र आहे.

जालना तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात ७४० सदस्य विजयी होणार असून, त्यासाठी एक लाख ३० हजार ६२० मतदार मतदान करणार आहेत. बुधवारपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. उमेदवार विचारत असलेल्या शंकांचे निरसनही अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

भोकरदन तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे पॅनल तयार करण्यासाठी कार्यकर्ते गावात गुंतले आहेत. त्यामुळे शहरातील नेहमी येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात २८ टेबल ठेवले आहेत. उमेदवाराने अर्ज ऑनलाइन केल्यानंतर ऑफलाइन अर्ज या निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. मात्र, बुधवारी एकही अर्ज आला नसल्याचे तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार धर्माधिकारी यांनी सांगितले. शहरातील सर्वच ऑनलाइन सेंटरच्या ठिकाणी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच जात प्रमाणपत्र, मिळविणेसुद्धा अवघड झाले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे नवीन खाते उघडण्यासाठीही दमछाक होत आहे.