शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

दुसऱ्या दिवशी ६४ हजार विद्यार्थी शाळेत हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ४५ हजार १२ विद्यार्थी ...

जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ४५ हजार १२ विद्यार्थी शाळेत आले होते. दुसऱ्या दिवशी तब्बल ६४ हजार ९२८ विद्यार्थी शाळेत आले होते, तर कोरोना चाचणीत १४ शिक्षक व २७ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार शाळास्तरावर निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतराची बैठक व्यवस्था, हॅण्ड सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर आदींची सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. कोरोनामुळे बंद असलेल्या या शाळांची चालू शैक्षणिक वर्षात प्रथमच बुधवारी घंटी वाजली. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या फेऱ्यात आणि कोरोनामुळे घरात अडकलेले विद्यार्थी शाळेत आल्याने शाळाही गजबजल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील १५२४ शाळा भरल्या होत्या. या शाळांमध्ये ६४ हजार ९२८ विद्यार्थी हजर राहिले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सर्व ती दक्षता घेतली जात असल्याचे दिसून आले.

जालना तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी

जालना तालुक्यातील २०५ शाळांमध्ये दुसऱ्या दिवशी सर्वाधिक १७ हजार ३४६ विद्यार्थी हजर झाले होते. बदनापूर तालुक्यातील १३५ शाळांमध्ये ४६१४, अंबड तालुक्यातील २२० शाळांमध्ये दहा हजार ४५६, घनसावंगी तालुक्यातील १७९ शाळांमध्ये ५५०३, परतूर तालुक्यातील १६० शाळांमध्ये ६००९, मंठा तालुक्यातील १५१ शाळांमध्ये ३९९८, भोकरदन तालुक्यातील ३०३ शाळांमध्ये १२ हजार १७८, तर जाफराबाद तालुक्यातील १७१ शाळांमध्ये ४८२४ विद्यार्थी हजर झाले होते.