शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नवनिर्वाचित उमेदवारांचा गौरव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

मिरवणूक कार्यक्रम पिंपळगाव रेणुकाई : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन) येथे शुक्रवारी ...

मिरवणूक कार्यक्रम

पिंपळगाव रेणुकाई : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन) येथे शुक्रवारी निधी संकलन अभियान राबविण्यात आले. गावातील रेणुकाई मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

मिरची लागवडीतून आर्थिक किमया

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील राम लहाने यांनी २० गुंठे जमिनीवर लागवड केलेल्या मिरचीतून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पारंपरिक पिकातून चांगले उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काळानुरूप शेतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या मिरची पिकाची लागवड केली असल्याचे लहाने यांनी सांगितले.

पिकांचे नुकसान

मान देऊळगाव : बदनापूर तालुक्यातील मान देऊळगावसह आसोला, पठार देऊळगाव व तुपेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर वाढला आहे. डुकरे हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान करीत असल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

पाणीटंचाई कायम

मान देऊळगाव : मान देऊळगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत घाणेवाडी येथून पाणी आणण्यात आले आहे, परंतु विहिरीजवळ विजेची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून गावात पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

अंबड शहरात पथकाची स्थापना

अंबड : शहरातील अकृषिक कर वसुलीसाठी महसूल विभागाच्या वतीने १५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विविध वसाहत व कॉलनीनिहाय अकृषिक कराची वसुली करण्यात येणार आहे. पाच मंडळाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात मंडळाधिकारी शिवाजी गाडेकर, बी.बी. भार्डीकर आदींचा समावेश आहे.

मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम

जाफराबाद : येथील दिवाणी न्यायालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.र.तु. देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विनोद डिगे, सचिव ॲड.सादिक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी

मंठा : शहरातील मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सांडपाणी येत आहे. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. विशेषत: सांडपाणी येत असलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडली असून, त्यात सांडपाणी साचत आहे. वेळीच याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.