शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

नवनिर्वाचित उमेदवारांचा गौरव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

मिरवणूक कार्यक्रम पिंपळगाव रेणुकाई : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन) येथे शुक्रवारी ...

मिरवणूक कार्यक्रम

पिंपळगाव रेणुकाई : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन) येथे शुक्रवारी निधी संकलन अभियान राबविण्यात आले. गावातील रेणुकाई मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

मिरची लागवडीतून आर्थिक किमया

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील राम लहाने यांनी २० गुंठे जमिनीवर लागवड केलेल्या मिरचीतून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पारंपरिक पिकातून चांगले उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काळानुरूप शेतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या मिरची पिकाची लागवड केली असल्याचे लहाने यांनी सांगितले.

पिकांचे नुकसान

मान देऊळगाव : बदनापूर तालुक्यातील मान देऊळगावसह आसोला, पठार देऊळगाव व तुपेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर वाढला आहे. डुकरे हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान करीत असल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

पाणीटंचाई कायम

मान देऊळगाव : मान देऊळगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत घाणेवाडी येथून पाणी आणण्यात आले आहे, परंतु विहिरीजवळ विजेची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून गावात पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

अंबड शहरात पथकाची स्थापना

अंबड : शहरातील अकृषिक कर वसुलीसाठी महसूल विभागाच्या वतीने १५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विविध वसाहत व कॉलनीनिहाय अकृषिक कराची वसुली करण्यात येणार आहे. पाच मंडळाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात मंडळाधिकारी शिवाजी गाडेकर, बी.बी. भार्डीकर आदींचा समावेश आहे.

मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम

जाफराबाद : येथील दिवाणी न्यायालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.र.तु. देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विनोद डिगे, सचिव ॲड.सादिक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी

मंठा : शहरातील मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सांडपाणी येत आहे. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. विशेषत: सांडपाणी येत असलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडली असून, त्यात सांडपाणी साचत आहे. वेळीच याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.