शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नाकर्त्या सरकारला धडा शिकविण्यासाठी हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:38 IST

शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.

मंठा : शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्तमान सरकारचा निषेध करण्यासाठी हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंतराव पाटील, राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित, गुलाबराव गावंडे, बसवराज पाटील, विजय अण्णा बोराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, बळीराम कडपे, कपिल आकात, अ‍ॅड. पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, सतीश टोपे, निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.पवार म्हणाले की, युती सरकारच्या काळात समाजातील एकही घटक समाधानी नाही. केवळ घोषणा देणारे सरकार आणि जॅकेट घालून फिरणा-या मंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली आहे. दिल्ली दरबारी महाराष्ट्राची पत राहिली नसून विकासाच्या गप्पा मारणारे सरकार आता जातीय तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, उलट महाराष्ट्राच्या विकासाची घडी विस्कटली.या प्रसंगी जयंतराव पाटील, राजेश टोपे, चित्रा वाघ, बळीराम कडपे, निसार देशमुख, भाऊसाहेब गोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड.पंकज बोराडे यांनी तर आभार प्रदर्शन कपिल आकात यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.--------------पाणीपुरवठा नव्हे, वाळू उपसा मंत्रीविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सध्याच्या सरकारची कर्जमाफी फसवी असून, सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाची जाण नाही. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे वाळू उपसा मंत्री असल्याची टीका पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. केंद्र्र व राज्यातील सरकार हे भुलभुलैय्या करणारे असून, त्यांच्या भूलथापांच्या आहारी जनतेने जाऊ नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.