शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

नाकर्त्या सरकारला धडा शिकविण्यासाठी हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:38 IST

शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.

मंठा : शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्तमान सरकारचा निषेध करण्यासाठी हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंतराव पाटील, राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित, गुलाबराव गावंडे, बसवराज पाटील, विजय अण्णा बोराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, बळीराम कडपे, कपिल आकात, अ‍ॅड. पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, सतीश टोपे, निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.पवार म्हणाले की, युती सरकारच्या काळात समाजातील एकही घटक समाधानी नाही. केवळ घोषणा देणारे सरकार आणि जॅकेट घालून फिरणा-या मंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली आहे. दिल्ली दरबारी महाराष्ट्राची पत राहिली नसून विकासाच्या गप्पा मारणारे सरकार आता जातीय तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, उलट महाराष्ट्राच्या विकासाची घडी विस्कटली.या प्रसंगी जयंतराव पाटील, राजेश टोपे, चित्रा वाघ, बळीराम कडपे, निसार देशमुख, भाऊसाहेब गोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड.पंकज बोराडे यांनी तर आभार प्रदर्शन कपिल आकात यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.--------------पाणीपुरवठा नव्हे, वाळू उपसा मंत्रीविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सध्याच्या सरकारची कर्जमाफी फसवी असून, सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाची जाण नाही. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे वाळू उपसा मंत्री असल्याची टीका पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. केंद्र्र व राज्यातील सरकार हे भुलभुलैय्या करणारे असून, त्यांच्या भूलथापांच्या आहारी जनतेने जाऊ नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.