शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

नैसर्गिक आपत्ती : नुकसान भरपाईत ‘वर्गवारी’ हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:10 IST

फळबागांवर एकरी होणारा खर्च, भाजीपाला, बियाणे उत्पादन वा पारंपरिक पिकांसाठी लागणारी गुंतवणूक ही वेगवेगळी असते याचा विचार व्हायला हवा. त्यानुसारच भरपाई मिळाली तरच शेतक-यांना न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लाखांचा खर्च आणि हजारांच्या भरपाईने काही साध्य होण्याची चिन्हे नाहीत.

राजेश भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम वारंवार दिसून येत आहेत. बेमोसमी पाऊस, गारपीट इ. नैसर्गिक आपत्तींचे संकट राज्यासह जिल्ह्यावरही नव्याने येत आहेत. गारपिटीच्या घटनेने हे अधोरेखित झाले असून, फळबाग, भाजीपाला व पारंपरिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैतिक जबाबदारी म्हणून शासनाने भरपाई देणे हे कर्तव्यच. मात्र, ती देताना फळबागांवर एकरी होणारा खर्च, भाजीपाला, बियाणे उत्पादन वा पारंपरिक पिकांसाठी लागणारी गुंतवणूक ही वेगवेगळी असते याचा विचार व्हायला हवा. त्यानुसारच भरपाई मिळाली तरच शेतक-यांना न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लाखांचा खर्च आणि हजारांच्या भरपाईने काही साध्य होण्याची चिन्हे नाहीत.विविध प्रकारच्या प्रदूषणांचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल यातून नैसर्गिक आपत्ती मानवी समूहांवर कोसळत आहेत. वादळी वारा, अवकाळी पाऊस, बेमोसमी पडणारा पाऊस गारपीट आदींमुळे शेतमालाची अपरिमित हानी होत आहे. अनेक महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके, बागा क्षणार्धात हातून जात असताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतक-यांसमोर येत आहे. त्यातच पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग. यामुळेही शेती हा आतबट्ट्याचाच व्यवसाय ठरत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.जिल्ह्यात कोरडवाहू जमीन जास्त असली तरी बागायती जमीनही दखलपात्र इतकी नक्कीच आहे. द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी इ. फळबागा जिल्ह्याच्या बहुतांश भागात काही वर्षांपासून शेतक-यांनी लावल्या आहेत. यात रात्रंदिवस मेहनत करुन फळबागा वाढविणे, जगवणे, रोगराईपासून दूर ठेवणे हे शेतक-यांपुढील मोठे आव्हान असते. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या संकटांनी तर शेतकरी कोलमडून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एक एकर फळबागेसाठी जवळपास आठ लाखांचा खर्च येतो. कांदा, भाजीपाला इ. च्या बियाणे निर्मितीसाठी २ ते ३ लाखांचा खर्च येतो. तर पारंपरिक पिकांसाठी काही हजारांचा खर्च शेतक-यांना येत असतो. यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल व फळबागा हातच्या गेल्या, तर सरकार सरसकट आर्थिक मदत जाहीर करते. वस्तुत: फळबाग, भाजीपाला, बियाणे उत्पादन (शेडनेट) व पारंपरिक अशी वर्गवारी करुन सरकारने नुकसानीचे पंचनामे केल्यास शेतकºयांना निश्चितच न्याय मिळू शकेल.उत्पादन खर्चानुसार भरपाई मिळाली तर शेतक-यांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे अशी मागणी रेटली तरच मायबाप सरकारकडून शेतक-यांना भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा करता येऊ शकेल. अन्यथा आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात शेतकरी उपेक्षित राहण्याची दाट शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर अडथळ्यांची शर्यत पार करुनही उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला नाही तर शेतक-यांनीकाय करावे, हे मायबाप सरकारने सांगावे.