शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘स्वयंरोजगार’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:00 IST

: केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत व्यवसाय कर्जासाठी दाखल शेकडो प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांकडे पडून आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत व्यवसाय कर्जासाठी दाखल शेकडो प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांकडे पडून आहेत. नगर पालिकेमार्फत दाखल झालेल्या ६२८ पैकी केवळ ४३ प्रकरणांना बँकांनी मंजुरी दिली आहे. तर तब्बल ३२६ प्रकरणे विविध कारणास्तव नामंजूर करण्यात आली आहेत. उर्वरित प्रस्ताव मागील वर्षभरापासून प्रलंबित असून, शहरातील लाभार्थी मात्र, ‘आज ना उद्या कर्ज मिळेल’ या आशेवर बँकांच्या पायऱ्या झिजवत आहेत.सुशिक्षित बेरोजगारांना, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना अनेक स्वप्ने दाखवित केंद्र शासनाने कर्जपुरवठ्याच्या विविध योजना जाहीर केल्या. याच धर्तीवर शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बीपीएल धारकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, बँकांकडून कर्ज मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वयंरोजगार दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुरू केली. या योजनेंतर्गत जालना नगर पालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात वैयक्तिक १२० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, उद्दिष्टापेक्षा अधिक प्रस्ताव आल्याने पालिकेने छाननीनंतर ६१८ प्रस्ताव बँकांकडे पाठविले. त्यातील केवळ ४३ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली. १८ जणांना कर्जाचे वाटप केले आहे. तर तब्बल ३२६ प्रस्ताव विविध कारणास्तव नामंजूर करण्यात आले असून, इतर प्रकरणे बँकांकडे प्रलंबित आहेत. गट व्यवसायासाठी ८ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पालिकेने १६ प्रस्ताव बँकांना दिले आहेत. मात्र, यातील केवळ एक प्रस्ताव मंजूर करून कर्ज वाटप करण्यात आले. दोन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असून, इतर प्रस्ताव प्रलंबित आहेत. एकूणच केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला राष्ट्रीयीकृत बँकांकडून खोडा घातला जात असून, लाभार्थ्यांच्या आशेवरही पाणी पडत असल्याचे चित्र आहे.महिला बचत गटांनाही मिळेना कर्ज२०१७-१८ या आर्थिक वर्षात शहरातील ९० महिला बचत गटांच्या व्यवसाय प्रस्तावाचे उद्दिष्ट पालिकेला मिळाले होते. दाखल झालेले ७५ प्रस्ताव पालिकेने बँकांकडे पाठविले होते.बँकांनी केवळ १३ प्रकरणे मंजूर केली आहेत. १४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. तर उर्वरित प्रकरणे बँकांकडे प्रलंबीत असून, महिला बचत गटाचे नियोजित व्यवसायही कागदावर आहेत.चौकशी करून अहवाल द्याया योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळावे म्हणून शहरातील किशोर रत्नपाखरे यांनी पाठपुरावा केला. वर्षभर बँकेच्या पायºया झिजविल्या. मात्र, प्रस्ताव मंजूर होत नसल्याने व विविध सबबी पुढे केल्या जात असल्याने रत्नपाखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.तक्रारीची दखल घेत नगर विकास शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अधिका-यांच्या सूचनांकडेही दुर्लक्षपालिकेमार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने पाठपुरावा केला. याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिका-यांसह वरिष्ठ अधिका-यांनीही बँकांनी तातडीने उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, अशा सूचना दिल्या. मात्र, वर्षभरापासून प्रलंबित असलेले प्रस्ताव पाहता संबंधित बँक अधिका-यांनी या सूचनांकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाBanking Sectorबँकिंग क्षेत्र