शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

नामस्मरणाने मानवी जीवनाचा उद्धार होतो- सत्यात्मतीर्थ स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:55 IST

नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवन हे मागील जन्मातील पुण्याईमुळे मिळाले आहे. प्रत्येकाने मिळालेले हे जीवन सार्थकी लागावे, यासाठी ईश्वर, गुरूचे नामस्मरण केले पाहिजे, नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.जालना शहरातील योगेश्वरी नगरमधील योगेश्वरी देवी मंदिरात शनिवारी त्यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली. प्रवचन कार्यक्रमात सत्यात्मतीर्थ स्वामी म्हणाले की, नामस्मरणाने केवळ व्यक्तीचाच उध्दार होतो, असे नाही तर त्याच्या कुळाचाही उध्दार होतो. आपण केलेले पाप हेच आपल्या दु:खाचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी हसत चित्ताने राहिले पाहिजे. जीवन जगताना अनेक संकटं, प्रश्न हे निर्माण होत असतात. या प्रश्नांवर मात करण्यासाठी अध्यात्माची साधना आवश्यक आहे.नामस्मरण करत असताना आपले चित्त हे एकाग्र असले पाहिजे. त्यावेळी कुठलेही विचार मनात आणू नयेत. आपल्या थोर संतांनी देखील नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. यावेळी सत्यात्मतीर्थ स्वामी यांनी दररोजचे जीवन जगताना पूजा, अर्चा, जप-तप का केले पाहिजे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमास मूलराम पूजन, आरती, महाप्रसाद इ. कार्यक्रम पार पडले. मराठवाड्यातून स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीततेसाठी निवृत्त प्राचार्य सुरेश संदीकर, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, किशोर देशपांडे, प्रफुल्ल निटूरकर, राजेंद्र वालूरकर, रवींद्र देशपांडे, धनंजय याडकीकर, सुनील कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुत्माचार्य यांनी केले तर आभार सोनाली देशमुख यांनी मानले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे