शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नामस्मरणाने मानवी जीवनाचा उद्धार होतो- सत्यात्मतीर्थ स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:55 IST

नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवन हे मागील जन्मातील पुण्याईमुळे मिळाले आहे. प्रत्येकाने मिळालेले हे जीवन सार्थकी लागावे, यासाठी ईश्वर, गुरूचे नामस्मरण केले पाहिजे, नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.जालना शहरातील योगेश्वरी नगरमधील योगेश्वरी देवी मंदिरात शनिवारी त्यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली. प्रवचन कार्यक्रमात सत्यात्मतीर्थ स्वामी म्हणाले की, नामस्मरणाने केवळ व्यक्तीचाच उध्दार होतो, असे नाही तर त्याच्या कुळाचाही उध्दार होतो. आपण केलेले पाप हेच आपल्या दु:खाचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी हसत चित्ताने राहिले पाहिजे. जीवन जगताना अनेक संकटं, प्रश्न हे निर्माण होत असतात. या प्रश्नांवर मात करण्यासाठी अध्यात्माची साधना आवश्यक आहे.नामस्मरण करत असताना आपले चित्त हे एकाग्र असले पाहिजे. त्यावेळी कुठलेही विचार मनात आणू नयेत. आपल्या थोर संतांनी देखील नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. यावेळी सत्यात्मतीर्थ स्वामी यांनी दररोजचे जीवन जगताना पूजा, अर्चा, जप-तप का केले पाहिजे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमास मूलराम पूजन, आरती, महाप्रसाद इ. कार्यक्रम पार पडले. मराठवाड्यातून स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीततेसाठी निवृत्त प्राचार्य सुरेश संदीकर, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, किशोर देशपांडे, प्रफुल्ल निटूरकर, राजेंद्र वालूरकर, रवींद्र देशपांडे, धनंजय याडकीकर, सुनील कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुत्माचार्य यांनी केले तर आभार सोनाली देशमुख यांनी मानले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे