शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

दारूच्या वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे

आष्टी : विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की खून झालेले शेख मुनवर शेख नूर (३८) हे गुत्तेदारी पद्धतीने विहिरींचे खोदकाम करायचे. त्यांचे दैठणा शिवारात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे यांनी शेख मुनवर व त्यांचा मित्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथील शेतात जेवणासाठी बोलावले. दोघे रात्री जेवणासाठी गेले असता, त्या ठिकाणी विहिरीवर खोदकाम करणारे सहा ते सात मजूरही होते. तायडे यांनी दारू व मटणाचा बेत आखला होता. सर्व जण दारुपीत असताना तायडे यांनी शेख मुनवर व आढाव यांना पाणी न टाकता दारु पिण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शेख मुनवर, रमेश तायडे व ज्ञानेश्वर आढाव यांच्यात वाद झाला. त्यामुळे आढाव हे गावाकडे निघून गेले. शेख मुनवर तेथेच होते. रमेश तायडे व इतर सहा ते सात जणांनी दारु पिण्याच्या कारणावरून व गुत्तेदारीच्या कारणावरून शेख मुनवर यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सरवर शेख नूर यांच्या फिर्यादीवरून संशयित सखाराम रामचंद्र खरात, शिवाजी कठाळू सोळंके, सिद्धार्र्थ गुणाजी शेजूळ, बद्रीनाथ दौलतराव पारखे (सर्व.रा. साखळगाव,ता.परतूर) रमेश रख्माजी तायडे (रा.दैठणा) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन परतूर न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करत आहेत.-------------असा झाला घटनेचा उलगडाशुक्रवारी दैठणा शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना,शेख मुनवर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, रात्री गावाकडे परत गेलेले ज्ञानेश्वर आढावा यांनी घडलेला सर्व प्रकार शेख मुनवर यांचा भाऊ सरवर शेख व पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.