शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे

आष्टी : विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की खून झालेले शेख मुनवर शेख नूर (३८) हे गुत्तेदारी पद्धतीने विहिरींचे खोदकाम करायचे. त्यांचे दैठणा शिवारात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे यांनी शेख मुनवर व त्यांचा मित्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथील शेतात जेवणासाठी बोलावले. दोघे रात्री जेवणासाठी गेले असता, त्या ठिकाणी विहिरीवर खोदकाम करणारे सहा ते सात मजूरही होते. तायडे यांनी दारू व मटणाचा बेत आखला होता. सर्व जण दारुपीत असताना तायडे यांनी शेख मुनवर व आढाव यांना पाणी न टाकता दारु पिण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शेख मुनवर, रमेश तायडे व ज्ञानेश्वर आढाव यांच्यात वाद झाला. त्यामुळे आढाव हे गावाकडे निघून गेले. शेख मुनवर तेथेच होते. रमेश तायडे व इतर सहा ते सात जणांनी दारु पिण्याच्या कारणावरून व गुत्तेदारीच्या कारणावरून शेख मुनवर यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सरवर शेख नूर यांच्या फिर्यादीवरून संशयित सखाराम रामचंद्र खरात, शिवाजी कठाळू सोळंके, सिद्धार्र्थ गुणाजी शेजूळ, बद्रीनाथ दौलतराव पारखे (सर्व.रा. साखळगाव,ता.परतूर) रमेश रख्माजी तायडे (रा.दैठणा) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन परतूर न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करत आहेत.-------------असा झाला घटनेचा उलगडाशुक्रवारी दैठणा शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना,शेख मुनवर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, रात्री गावाकडे परत गेलेले ज्ञानेश्वर आढावा यांनी घडलेला सर्व प्रकार शेख मुनवर यांचा भाऊ सरवर शेख व पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.