शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

दारूच्या वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे

आष्टी : विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की खून झालेले शेख मुनवर शेख नूर (३८) हे गुत्तेदारी पद्धतीने विहिरींचे खोदकाम करायचे. त्यांचे दैठणा शिवारात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे यांनी शेख मुनवर व त्यांचा मित्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथील शेतात जेवणासाठी बोलावले. दोघे रात्री जेवणासाठी गेले असता, त्या ठिकाणी विहिरीवर खोदकाम करणारे सहा ते सात मजूरही होते. तायडे यांनी दारू व मटणाचा बेत आखला होता. सर्व जण दारुपीत असताना तायडे यांनी शेख मुनवर व आढाव यांना पाणी न टाकता दारु पिण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शेख मुनवर, रमेश तायडे व ज्ञानेश्वर आढाव यांच्यात वाद झाला. त्यामुळे आढाव हे गावाकडे निघून गेले. शेख मुनवर तेथेच होते. रमेश तायडे व इतर सहा ते सात जणांनी दारु पिण्याच्या कारणावरून व गुत्तेदारीच्या कारणावरून शेख मुनवर यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सरवर शेख नूर यांच्या फिर्यादीवरून संशयित सखाराम रामचंद्र खरात, शिवाजी कठाळू सोळंके, सिद्धार्र्थ गुणाजी शेजूळ, बद्रीनाथ दौलतराव पारखे (सर्व.रा. साखळगाव,ता.परतूर) रमेश रख्माजी तायडे (रा.दैठणा) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन परतूर न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करत आहेत.-------------असा झाला घटनेचा उलगडाशुक्रवारी दैठणा शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना,शेख मुनवर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, रात्री गावाकडे परत गेलेले ज्ञानेश्वर आढावा यांनी घडलेला सर्व प्रकार शेख मुनवर यांचा भाऊ सरवर शेख व पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.