शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विल्हेवाट लावा नाही तर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:07 IST

उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत.

जालना : पाणीपाऊच व प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे शहरातील नाल्यांचा श्वास कोंडला आहे. नाल्यांची पाणी रस्त्यावर येत असून, सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. इतर जिल्ह्यात कुठेही न दिसणारी पाणीपाऊच संस्कृती जालन्यात पाहावयास मिळते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काहीही न विचारता पाणीपाऊच समोर ठेवले जाते. लग्न, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मोर्चे, मिरवणुका यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपाऊच वाटप केले जाते. त्यामुळे पूर्वी केवळ जारच्या माध्यमातून पाणीविक्री करणा-या कंपन्यांनी आता पाणीपाऊच विक्रीवर भर देण्यास सुुरुवात केली आहे. उत्पादक, वितरक, ग्राहक अशी एक साखळीच पाणीपाऊच संस्कृतीमुळे तयार झाली आहे. यामुळे शहराचे स्वरुप मात्र बदलले आहे. हॉटेलबाहेरील परिसरात, शहरातील रस्त्यांसह नाल्यांमध्ये सर्वत्र पाऊच दिसत आहेत. शहरात निघणा-या एकूण कच-यापैकी सर्वाधिक कचरा प्लॅस्टिक कॅरीबॅग व पाणीपाऊचचा आहे. शहरात प्लॅस्टिक कच-याने गंभीर स्वरुप घेतले आहे. याला प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे नगरपालिकेने महाराष्ट्र प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री, वापर व विल्हेवाट अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणी ५० हजारांचा दंड लावून गुन्हे दाखल करण्यात का येऊ नये, असे खांडेकर यांनी सांगितले. तशी नोटीसही उत्पादकांना देण्यात आली आहे. तीन दिवसांत खुलासा सादर करून, पाणीपाऊचची विल्हेवाट लावावी, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नोटिसीत नमूद आहे.-----------पाणी पाऊचची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांचीच आहे, हे कंपनीच्या संचालकांना बैठकीत सांगण्यात आले. उत्पादकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पुढे पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणाºया उत्पादक व विके्रत्यांवर कारवाई करण्यात येईल.संतोष खांडेकर, मुख्याधिकारी न.प. जालना