शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मुद्रेगाव खून प्रकरण : पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:33 IST

घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सात पैकी पाच आरोपींना गोंदी पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपूरी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सात पैकी पाच आरोपींना गोंदी पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती देण्यात आली. २ डिसेंबरला बाबूराव भगवान राऊत यांचा खून झाला होता. त्यात बाबूरावचे वडील भगवान हे देखील जखमी झाले होते. त्यांचा औरंबाादेतील घाटी रूग्णालयात उपचार सुरू असताना १० डिसेंबरला मृत्यू झाला होता.मुद्रेगाव येथे बाबूराव राऊत व त्यांच्या भावकीत शेतातील रस्त्याच्या वादावरून जुना विवाद होता. २ डिसेंबरला बाबूराव राऊत हे शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याच हाणामारीत बाबूरावचे वडील भगवानराव राऊत हे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांनाा अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा दहा डिसेंबरला उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यावेळी भगवानराव राऊत यांच्या नातेवाईकांनी जो पर्यंत या प्रकरणातील आरोपी अटक होत नाहीत, तो पर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र मध्यस्ती केल्यानंतर हा तिढा सुटला.दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गोंदी पोलीस मागावर होते. हे आरोपी परभणी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून गोंदी पोलिसांनी संशयित आरोपी गोविंद राऊत, गोपाल राऊत, संभाजी राऊत, शिवाजी राऊत, तसेच माजलगाव तालुक्यातील राऊत यांचा नातेवाईक तुकाराम शेजूळ यांना अटक करण्यात आल्याचे गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, जमादार पगारे, करंडे, शिंदे या आरोपींना अटक केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक