शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महावितरणच्या अधिका-यांना मंदिरात कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:30 IST

कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले

बदनापूर : कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले. तालुक्यातील चनेगाव येथे शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.तालुक्यातील चनेगाव येथील कृषीपंपांचे वीजबिल थकल्यामुळे वीजपुरवठा एक डिसेंबरपासून खंडित आहे. याविषयी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. राजूर-दाभाडी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुपारी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. वीज भारनियमन कमी करावे, कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली. आंदोलक शेतक-यांची चर्चा करण्यासाठी दाभाडी येथील सहायक अभियंता अमरपाल खुशाल मून, आर. डी. पुंगळे, प्रदीप शेकळे, विजय दुधाने, विलास जाधव हे अन्य कर्मचा-यांसह चनेगाव येथे गेले. या वेळी शेतक-यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र अधिका-यांनी थकित बिलाचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अधिका-यांना गावातील मारोती मंदिरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घेतले.हा प्रकार समजल्यानंतर बदनापूर ठाण्याचे सहायक निरीक्षक बोलकर, कॉन्स्टेबल जॉन कसबे, एस. पी. चव्हाण हे गावात पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तासाभरानंतर अभियंत्यांना बाहेर काढले.दरम्यान, या प्रकरणी अमरपाल खुशाल मून यांनी दिलेल्या तक्रारीवरून निवृत्ती शेवाळे, नामदेव निहाळ, सदाशिव जायभाये, ढोरकूल, कृष्णा घुगे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या ५० ते ६० जणांवर बदनापूर ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल कसबे तपास करीत आहेत.