शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या ...

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, महावितरणने वीज कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी आर्थिक संकटात असून, त्यांची रब्बी हंगामातील पिकांवर मदार आहे. महावितरणने ऐन पिकांना पाणी भरणीच्या हंगामात वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी राजूर उपकेंद्रात सहाय्यक अभियंता गावंडे यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. तसेच वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक अभियंता गावंडे यांनी शेतकऱ्यांनी येत्या चार दिवसांत टप्प्याटप्प्याने थकबाकी भरावी, असे सांगून वीजपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी उपसभापती गजानन नागवे, रावसाहेब भंवर, निवृत्ती शेवाळे, विनोद पुंगळे, कोंडीराम सावंत, अशोक मुटकुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो