शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या ...

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, महावितरणने वीज कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी आर्थिक संकटात असून, त्यांची रब्बी हंगामातील पिकांवर मदार आहे. महावितरणने ऐन पिकांना पाणी भरणीच्या हंगामात वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी राजूर उपकेंद्रात सहाय्यक अभियंता गावंडे यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. तसेच वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक अभियंता गावंडे यांनी शेतकऱ्यांनी येत्या चार दिवसांत टप्प्याटप्प्याने थकबाकी भरावी, असे सांगून वीजपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी उपसभापती गजानन नागवे, रावसाहेब भंवर, निवृत्ती शेवाळे, विनोद पुंगळे, कोंडीराम सावंत, अशोक मुटकुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो