शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

वीजचोरीकडे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची ...

अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. तर दुसरीकडे शहरी, ग्रामीण भागात असंख्य नागरिक आकडे टाकून वीज वापरत असून, ही वीजचोरी रोखण्याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कानाडोळा होत आहे.

कधी रोहित्र जळणे, कधी तांत्रि समस्या निर्माण होण्यामुळे ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. याचा फटका घरगुती वीज ग्राहकांसह उद्योग, शेतकरी व्यवसायालाही बसत आहे. त्यात गत काही दिवसांपासून महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीची मोहीम जोमात सुरू आहे. त्यासाठी शेतीचा वीजपुरवठा खंडितही करण्यात आला होता. परंतु, सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबविणाऱ्या या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वीज चोरांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेकजण चोरून वीज वापरत असून, याचा अधिभार नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अंबड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून वीज वापरली जात आहे. ही बाब पाहता महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष पथके तयार करून वीज चोरणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई करण्याची गरज आहे.

कोट

सध्या उन्हाळ्याचेेे दिवस सुरू असून, पिकाला पाणी देणे गरजचे आहे. शिवाय भारनियमनामुळे वेळी -अवेळी पाणी देण्याचे काम करावे लागते. विजेचा लपंडाव ही सुद्धा नित्याचीच बाब झालेली आहे. याचा फटका शेती व्यवसायाला बसत आहेण

भिकाजी भोजने, शेतकरी मार्डी