शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम ...

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम एच २१ बीएफ. ७१७८ ची समोरासमोर धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुण ठार झाले. यामध्ये शंतनू नायबराव काकडे वय २२ वर्षे रा.जयपूर, कैलास विठ्ठल नेवरे ,वय २३ वर्षे रा.मेसखेडा , रमेश दशरथ घुगे ,वय २२ वर्षे रा. मेसखेडा, विष्णू उद्धव चव्हाण ,वय २२ वर्षे,रा.मेसखेडा , नारायण दिगंबर वरकड ,वय २४ वर्षे रा. तळतोंडी या पाच तरुणांचा समावेश आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण मंठा तालुक्यावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हे पाचही मित्र मंठा तालुक्यातील एका मित्राच्या लग्नासाठी वडाळा ता. नेवासा या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. लग्न लावून तेथून पुढे कशासाठी आणि कुठे गेले होते, याबाबत त्यांनी कुणालाच सविस्तर सांगितले नसल्याचे समजते. त्यामुळे कुणी शिर्डी ,पुणे, मुंबईला जात होते, असे सांगत आहेत.

यातील नारायण दिगंबर वरकड हा ड्रायव्हर असून, त्याचे वडील आणि भाऊ शेतकाम करतात. रमेश दशरथ घुगे या तरुणाला दोन मुलं, पत्नी, दोन भाऊ एक बहीण व थकलेले वडील आहेत. कैलास नेवरे याला एक मुलगा, एक मुलगी एक भाऊ, पत्नी, आई - वडील आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कैलास नेवरे हा युवक मेसखेडा येथील सरपंच होता. विष्णू चव्हाण या तरुणाच्या मागे पत्नी, एक मुलगा एक भाऊ व आई - वडील आहेत. तर शंतनू नायबराव काकडे हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज मजूर सहकारी संस्थेचा संचालक होता. तो भाजपचा राजकीय कार्यकर्ता असून, आता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याने चांगली कामगिरी करून नऊच्या नऊ जागा निवडून आणण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, तसेच शंतनू काकडे या मुलाचे वडील मयत झालेले असून घरची सर्व जबाबदारी त्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे. दरम्यान या मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक घटनास्थळाकडे गेले असून, संध्याकाळपर्यंत मृतदेह गावाकडे येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मेसखेडा येथील तीन तरुणांवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जयपूर आणि तळतोंडी येथील युवकांवरही सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

चौकट

आता आम्ही कुणासाठी जगाव...

पती गेले, आता पतीनंतर घरचा करता मुलगा आमच्या जीवाला चटका देऊन गेला. आम्ही कुणाच्या जीवावर जगावं, असे म्हणत शंतनू काकडे या युवकाची आई कौशल्याबाई काकडे व पत्नी अंजुबाई देखील पतीच्या निधनाने हंबरडा फोडत कालची रात्र आमच्यासाठी काळ रात्र होती, असे म्हणत रडत होत्या तर इतर नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.