शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम ...

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम एच २१ बीएफ. ७१७८ ची समोरासमोर धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुण ठार झाले. यामध्ये शंतनू नायबराव काकडे वय २२ वर्षे रा.जयपूर, कैलास विठ्ठल नेवरे ,वय २३ वर्षे रा.मेसखेडा , रमेश दशरथ घुगे ,वय २२ वर्षे रा. मेसखेडा, विष्णू उद्धव चव्हाण ,वय २२ वर्षे,रा.मेसखेडा , नारायण दिगंबर वरकड ,वय २४ वर्षे रा. तळतोंडी या पाच तरुणांचा समावेश आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण मंठा तालुक्यावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हे पाचही मित्र मंठा तालुक्यातील एका मित्राच्या लग्नासाठी वडाळा ता. नेवासा या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. लग्न लावून तेथून पुढे कशासाठी आणि कुठे गेले होते, याबाबत त्यांनी कुणालाच सविस्तर सांगितले नसल्याचे समजते. त्यामुळे कुणी शिर्डी ,पुणे, मुंबईला जात होते, असे सांगत आहेत.

यातील नारायण दिगंबर वरकड हा ड्रायव्हर असून, त्याचे वडील आणि भाऊ शेतकाम करतात. रमेश दशरथ घुगे या तरुणाला दोन मुलं, पत्नी, दोन भाऊ एक बहीण व थकलेले वडील आहेत. कैलास नेवरे याला एक मुलगा, एक मुलगी एक भाऊ, पत्नी, आई - वडील आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कैलास नेवरे हा युवक मेसखेडा येथील सरपंच होता. विष्णू चव्हाण या तरुणाच्या मागे पत्नी, एक मुलगा एक भाऊ व आई - वडील आहेत. तर शंतनू नायबराव काकडे हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज मजूर सहकारी संस्थेचा संचालक होता. तो भाजपचा राजकीय कार्यकर्ता असून, आता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याने चांगली कामगिरी करून नऊच्या नऊ जागा निवडून आणण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, तसेच शंतनू काकडे या मुलाचे वडील मयत झालेले असून घरची सर्व जबाबदारी त्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे. दरम्यान या मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक घटनास्थळाकडे गेले असून, संध्याकाळपर्यंत मृतदेह गावाकडे येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मेसखेडा येथील तीन तरुणांवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जयपूर आणि तळतोंडी येथील युवकांवरही सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

चौकट

आता आम्ही कुणासाठी जगाव...

पती गेले, आता पतीनंतर घरचा करता मुलगा आमच्या जीवाला चटका देऊन गेला. आम्ही कुणाच्या जीवावर जगावं, असे म्हणत शंतनू काकडे या युवकाची आई कौशल्याबाई काकडे व पत्नी अंजुबाई देखील पतीच्या निधनाने हंबरडा फोडत कालची रात्र आमच्यासाठी काळ रात्र होती, असे म्हणत रडत होत्या तर इतर नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.