शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पाच तरुणांच्या अपघाताने मंठा तालुक्यात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम ...

हा अपघात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर मार्गावर घडला. या अपघातात खासगी बस व कार क्र.एम एच २१ बीएफ. ७१७८ ची समोरासमोर धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुण ठार झाले. यामध्ये शंतनू नायबराव काकडे वय २२ वर्षे रा.जयपूर, कैलास विठ्ठल नेवरे ,वय २३ वर्षे रा.मेसखेडा , रमेश दशरथ घुगे ,वय २२ वर्षे रा. मेसखेडा, विष्णू उद्धव चव्हाण ,वय २२ वर्षे,रा.मेसखेडा , नारायण दिगंबर वरकड ,वय २४ वर्षे रा. तळतोंडी या पाच तरुणांचा समावेश आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण मंठा तालुक्यावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हे पाचही मित्र मंठा तालुक्यातील एका मित्राच्या लग्नासाठी वडाळा ता. नेवासा या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. लग्न लावून तेथून पुढे कशासाठी आणि कुठे गेले होते, याबाबत त्यांनी कुणालाच सविस्तर सांगितले नसल्याचे समजते. त्यामुळे कुणी शिर्डी ,पुणे, मुंबईला जात होते, असे सांगत आहेत.

यातील नारायण दिगंबर वरकड हा ड्रायव्हर असून, त्याचे वडील आणि भाऊ शेतकाम करतात. रमेश दशरथ घुगे या तरुणाला दोन मुलं, पत्नी, दोन भाऊ एक बहीण व थकलेले वडील आहेत. कैलास नेवरे याला एक मुलगा, एक मुलगी एक भाऊ, पत्नी, आई - वडील आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कैलास नेवरे हा युवक मेसखेडा येथील सरपंच होता. विष्णू चव्हाण या तरुणाच्या मागे पत्नी, एक मुलगा एक भाऊ व आई - वडील आहेत. तर शंतनू नायबराव काकडे हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज मजूर सहकारी संस्थेचा संचालक होता. तो भाजपचा राजकीय कार्यकर्ता असून, आता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याने चांगली कामगिरी करून नऊच्या नऊ जागा निवडून आणण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, तसेच शंतनू काकडे या मुलाचे वडील मयत झालेले असून घरची सर्व जबाबदारी त्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे. दरम्यान या मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक घटनास्थळाकडे गेले असून, संध्याकाळपर्यंत मृतदेह गावाकडे येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मेसखेडा येथील तीन तरुणांवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जयपूर आणि तळतोंडी येथील युवकांवरही सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

चौकट

आता आम्ही कुणासाठी जगाव...

पती गेले, आता पतीनंतर घरचा करता मुलगा आमच्या जीवाला चटका देऊन गेला. आम्ही कुणाच्या जीवावर जगावं, असे म्हणत शंतनू काकडे या युवकाची आई कौशल्याबाई काकडे व पत्नी अंजुबाई देखील पतीच्या निधनाने हंबरडा फोडत कालची रात्र आमच्यासाठी काळ रात्र होती, असे म्हणत रडत होत्या तर इतर नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.