शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

ग्रामीण भागात कोरोनाचे सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेेची संभावना लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...

जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेेची संभावना लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या विळख्यात आजवर ११७६ जणांचा बळी गेला आहे. सर्वधिक मृत्यू ग्रामीण भागातील रुग्णांचे झाले असून, त्याचे प्रमाण ६० टक्के आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील २६ टक्के रुग्ण कोरोनाचे बळी ठरले असून, इतर जिल्ह्यातील १४ टक्के रुग्णांचा जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दीड वर्षापासून जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाची रुग्णसंख्या सध्या घटली आहे. रुग्णसंख्या घटल्याचे चित्र दिलासादायक असले तरी दैनंदिन आढळणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यात डेल्टा प्लसमुळे शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ६१ हजार ३८८ रुग्ण आढळले होते. त्यात ११७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ६० हजार १४९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातील ११७७ मयतांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७०१ (६० टक्के), शहरी भागातील ३१० (२६ टक्के) तर इतर जिल्ह्यातील १६६ (१४ टक्के) रुग्णांचा समावेश आहे. गत महिनाभरापासून रुग्णांची संख्या घटली आहे. असे असले तरी दैनंदिन आढळणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यात शासनानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला असून, त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.

७४९ पुरुषांचा मृत्यू

जिल्ह्यातील ११७७ मयतांमध्ये ७४९ पुरुषांचा समावेश आहे. तर ४२९ महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे यावरून दिसून येत आहे.

तीन महिने ठरले घातक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने अधिक घातक ठरले. यात मार्चमध्ये १०३, एप्रिलमध्ये २८९ आणि मे महिन्यात तब्बल २९५ जणांचा बळी गेला. जून महिन्यात ७२, जुलै महिन्यात १७ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.

ज्येष्ठांनाच अधिक धोका

आजवर झालेल्या मयतांचे प्रमाण पाहता ५० वर्षांवरील मयतांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. २१ ते ३० वर्षे वयोगटात २०, ३१ ते ४० वयोगटात ८६, ४१ ते ५० वयोगटात १६७, ५१ ते ६० वयोगटात ३१३, ६१ ते ७० वयोगटात ३४७, ७१ ते ८० वयोगटात १८३, ८१ ते ९० वयोगटात ५५ तर ९१ ते १०० वयोगटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

सूचनांचे पालन गरजेचेच

सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून, निर्बंधांचे पालन करून व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोराेनाचा संभाव्य धोका पाहता नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर, सुरक्षित अंतरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे आणि वेळेवर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

तालुका मयत

अंबड १३५

बदनापूर- ६०

भोकरदन ७५

घनसावंगी ९१

जाफराबाद- ६४

जालना ४२१

मंठा- ५०

परतूर- ७३

इतर जिल्हे- २०८