शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जालना जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:21 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबई विधानभवनावरील लाँग मार्चला पाठिंबा म्हणून शेतमजूर युनियन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबई विधानभवनावरील लाँग मार्चला पाठिंबा म्हणून शेतमजूर युनियन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुलीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भारिप बहुजन महासंघानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.शेतमजूर युनियच्या जिल्हा कमिटी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अंबड चौफुली येथून साडेअकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शेतकरी, मजूर महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चेक-यांना अडविले. या वेळी मोर्चेक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील हजारो मजुरांनी नमुना चार अर्ज भरून मनरेगाच्या कामाची मागणी केली. काम मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने सतत आंदोलने करून पाठपुरावा केला. मात्र, अद्याप मजुरांना काम मिळाले नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. मजुरांऐवजी यंत्राच्या साहाय्याने काम करून घेणा-या अधिका-यांची चौकशी करावी, लाँग मार्चमधील मागण्या मान्य कराव्यात, शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा, जलयुक्त ऐवजी मनरेगायुक्त शिवार ही संकल्पना राबवावी, विनाअट कर्जमाफी द्यावी, वन जमीन शेतक-यांच्या नावे करावी, समृद्धी महामाग प्रकल्प रद्द करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. निवेदनावर अण्णा सावंत, मधुकर मोकळे, सरिता शर्मा, अनिल मिसाळ, रंगनाथ तांगडे, बंडू कनसे, शेख शकिला, बबन गाते, राहुल छडीदार, अनिल मिसाळ आदींच्या स्वाक्ष-या आहेत.