शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पाण्याचे टँकर बनवून देण्यासाठी महिन्याभराची ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:02 IST

दिवसें दिवस दुष्काळाचे ढग जिल्ह्यात गडद होत चालले आहे. जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसें दिवस दुष्काळाचे ढग जिल्ह्यात गडद होत चालले आहे. जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. दुष्काळी परिस्थिती बघता, आतापासूनच टँकर तयार करण्यासाठी फॅब्रिकेशनच्या दुकानावर गर्दी वाढली आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जवळपास आठही तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हे चित्र उन्हाळ्यात वाढणार असल्याने पाण्यावर कोट्यवधी रुपयांचा होणारा खर्च बघता याचा फायदा घेण्यासाठी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. ५ हजार पासून ते ७ हजार लिटर पर्यंत टँकर तयार करण्यासाठी शहरातील फॅब्रिकेशनच्या दुकानावर टँकर तयार करण्यासाठी महिन्याभराची प्रतीक्षायादी असल्याचे दुकानदार सांगत आहेत.जिल्ह्यात सध्या ६८ टँकरव्दारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचा समावेश आहे. पूर्वी गावात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती. आता जिल्हाधिका-यांचा भार कमी करुन ते अधिकार तालुक्याच्या उपविभागीय अधिका-याकडे दिले आहे. टँकरलॉबीवाल्यांनी याचा फायदा घेण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. यासाठी अनेकांनी फॅब्रिकेशनच्या दुकानदाराला नव्याने काही टँकर तयार करण्यासाठी आॅर्डर्स दिल्याने फॅब्रिकेशनच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे.पाऊस कमी झाल्याने शेतक-यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अन्य शेती कामांसाठी टँकरची गरज पडणार आहे. मध्यंतरी शासकीय टँकरला जीपीएस प्रणाली नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता सर्व शासकीय टँकरवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकbusinessव्यवसाय