शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे टँकर बनवून देण्यासाठी महिन्याभराची ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:02 IST

दिवसें दिवस दुष्काळाचे ढग जिल्ह्यात गडद होत चालले आहे. जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसें दिवस दुष्काळाचे ढग जिल्ह्यात गडद होत चालले आहे. जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. दुष्काळी परिस्थिती बघता, आतापासूनच टँकर तयार करण्यासाठी फॅब्रिकेशनच्या दुकानावर गर्दी वाढली आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जवळपास आठही तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हे चित्र उन्हाळ्यात वाढणार असल्याने पाण्यावर कोट्यवधी रुपयांचा होणारा खर्च बघता याचा फायदा घेण्यासाठी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. ५ हजार पासून ते ७ हजार लिटर पर्यंत टँकर तयार करण्यासाठी शहरातील फॅब्रिकेशनच्या दुकानावर टँकर तयार करण्यासाठी महिन्याभराची प्रतीक्षायादी असल्याचे दुकानदार सांगत आहेत.जिल्ह्यात सध्या ६८ टँकरव्दारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचा समावेश आहे. पूर्वी गावात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती. आता जिल्हाधिका-यांचा भार कमी करुन ते अधिकार तालुक्याच्या उपविभागीय अधिका-याकडे दिले आहे. टँकरलॉबीवाल्यांनी याचा फायदा घेण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. यासाठी अनेकांनी फॅब्रिकेशनच्या दुकानदाराला नव्याने काही टँकर तयार करण्यासाठी आॅर्डर्स दिल्याने फॅब्रिकेशनच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे.पाऊस कमी झाल्याने शेतक-यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अन्य शेती कामांसाठी टँकरची गरज पडणार आहे. मध्यंतरी शासकीय टँकरला जीपीएस प्रणाली नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता सर्व शासकीय टँकरवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकbusinessव्यवसाय