शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मोबाईलने बिघडवले विद्यार्थ्यांचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती ...

जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती मोबाईल आला. परंतु, मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या मानसिकतेवर, शरीरावर मोठा परिणाम होत आहे.

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि मुले घरात कोंडली गेली. त्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांच्या वतीने ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. दैनंदिन दोन - तीन तास हे क्लासेस होतात. त्यानंतर होमवर्क घेणे, होमवर्क पाठविणे, इतर अभ्यासक्रम, यु-ट्यूबवरील अभ्यासाचे व्हिडिओ पाहणे आदींंसाठी लहान मुलांच्या हाती मोबाईल राहात आहे. परंतु, अनेक मुले अभ्यासाव्यतिरिक्त गेम खेळणे, यू-ट्यूबवर कार्टून पाहणे, लहान मुलांचे चित्रपट पाहणे यांसह इतर अनावश्यक बाबी मोबाईलवर पाहात आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर परिणाम होत असून, मुले मैदानी खेळापासूनही दूर जात असून, मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.

मुले कायम मोबाईलवर

दैनंदिन शाळांचे ऑनलाईन दोन ते तीन तास होतात. मुले होमवर्क व इतर अभ्यास मोबाईलवरच पाहतात. त्यानंतर मात्र, कार्टून पाहणे, मोबाईलवरील विविध गेम खेळणे, लहान मुलांचे चित्रपट पाहण्यात व्यस्त होऊन जातात. मुलांनी बाहेर जाऊ नये, यासाठी पालक त्यांना मोबाईल देत असल्याचे अंबड येथील शिवाजी बजाज म्हणाले.

विटीदांडू गायब

आमच्या काळात विटीदांडू, कबड्डी, खो- खो, सूरपारंब्या, काचेच्या गोट्या, आंब्याच्या कोया खेळणे आदी खेळ आम्ही खेळत होतो. परंतु, काळ बदलला, आधुनिक युगात खेळही बदलले. आजची मुले तर मैदानावर कमी आणि मोबाईलवर जास्त गुंगलेली दिसतात. त्यात कोरोनामुळे मुले घरात बंदिस्त झाल्याने मैदानी खेळ कमी झाल्याचे मापेगाव बु. येथील आसाराम दुगाने म्हणाले.

कोरोनामुळे मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले

कोरोनामुळे मुले घरात कोंडली गेली आहेत. त्यामुळे घरातच बसून मुले मोबाईल गेम, कॅरम, सापसिडी, चेस, टीव्ही गेम खेळत आहेत. त्यामुळे मैदानावरील सांघिक, वैयक्तिक खेळाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे वडीगोद्री येथील विजय चव्हाण यांनी सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम पडतो. नकारात्मकता, उदासिनता वाढू लागते. शिवाय मोबाईलमधील गेम चॅलेंजमुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना आहेत. या बाबी पाहता लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे.

- डॉ. नितीन पवार, मानसोपचारतज्ज्ञ