शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मोबाईलने बिघडवले विद्यार्थ्यांचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती ...

जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती मोबाईल आला. परंतु, मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या मानसिकतेवर, शरीरावर मोठा परिणाम होत आहे.

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि मुले घरात कोंडली गेली. त्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांच्या वतीने ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. दैनंदिन दोन - तीन तास हे क्लासेस होतात. त्यानंतर होमवर्क घेणे, होमवर्क पाठविणे, इतर अभ्यासक्रम, यु-ट्यूबवरील अभ्यासाचे व्हिडिओ पाहणे आदींंसाठी लहान मुलांच्या हाती मोबाईल राहात आहे. परंतु, अनेक मुले अभ्यासाव्यतिरिक्त गेम खेळणे, यू-ट्यूबवर कार्टून पाहणे, लहान मुलांचे चित्रपट पाहणे यांसह इतर अनावश्यक बाबी मोबाईलवर पाहात आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर परिणाम होत असून, मुले मैदानी खेळापासूनही दूर जात असून, मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.

मुले कायम मोबाईलवर

दैनंदिन शाळांचे ऑनलाईन दोन ते तीन तास होतात. मुले होमवर्क व इतर अभ्यास मोबाईलवरच पाहतात. त्यानंतर मात्र, कार्टून पाहणे, मोबाईलवरील विविध गेम खेळणे, लहान मुलांचे चित्रपट पाहण्यात व्यस्त होऊन जातात. मुलांनी बाहेर जाऊ नये, यासाठी पालक त्यांना मोबाईल देत असल्याचे अंबड येथील शिवाजी बजाज म्हणाले.

विटीदांडू गायब

आमच्या काळात विटीदांडू, कबड्डी, खो- खो, सूरपारंब्या, काचेच्या गोट्या, आंब्याच्या कोया खेळणे आदी खेळ आम्ही खेळत होतो. परंतु, काळ बदलला, आधुनिक युगात खेळही बदलले. आजची मुले तर मैदानावर कमी आणि मोबाईलवर जास्त गुंगलेली दिसतात. त्यात कोरोनामुळे मुले घरात बंदिस्त झाल्याने मैदानी खेळ कमी झाल्याचे मापेगाव बु. येथील आसाराम दुगाने म्हणाले.

कोरोनामुळे मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले

कोरोनामुळे मुले घरात कोंडली गेली आहेत. त्यामुळे घरातच बसून मुले मोबाईल गेम, कॅरम, सापसिडी, चेस, टीव्ही गेम खेळत आहेत. त्यामुळे मैदानावरील सांघिक, वैयक्तिक खेळाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे वडीगोद्री येथील विजय चव्हाण यांनी सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम पडतो. नकारात्मकता, उदासिनता वाढू लागते. शिवाय मोबाईलमधील गेम चॅलेंजमुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना आहेत. या बाबी पाहता लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे.

- डॉ. नितीन पवार, मानसोपचारतज्ज्ञ