शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘ध’ चा झाला ‘मा’; अन् फटका मात्र शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:56 IST

प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. यापूर्वी याच कारणामुळे तब्बल चार हजारांवर शेतक-यांना मंजूर विमा मिळविताना तीन वर्षे संघर्ष करावा लागला होता.प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना मृग बहरातील मोसंबी, डाळिंब आणि पेरु फळपिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये जिल्ह्यातील काही गावांची नावे चुकली आहेत. तालुक्यातील सेवलीचे नाव शेताली झाले आहे, तर ढोकसाळचे नाव ठोकसाळ झाले आहे. पाचनवडगावचे नाव पांचाळ वडगाव झाले आहे.या पूर्वी २०१४ मध्ये सेवली येथील ४ हजार २१५ शेतकºयांनी २०१४ मध्ये रबी पीक विम्यापोटी ३ लाख ६० हजार ९३३ रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत भरले होते. अतिवृष्टीमुळे रबी पिकांचे नुकसान झालेले असतानाही शासन निर्णयात सेवली गावाचे नाव शेताली असल्याच्या चुकीमुळे विमा कंपनीने नुकसान भरपाई दावा नाकारल्याने शेतक-यांना विमा लाभ मिळाला नव्हता. शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालकांनी खा. रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दिल्ली येथील कृषी सहसचिव डॉ. आशिषकुमार भुतानी यांच्या माध्यमातून विमा कंपनीला चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शेतक-यांना तब्बल दोन वर्षांनी पीकविम्याच्या ६६ लाख तीन हजार ९७० रुपयांचा लाभ मिळाला होता.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना