शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.स्वयंवर मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा फाऊंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कृषीपुरक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण विजय अण्णा बोराडे होते.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जगाच्या तुलनेत शेती, पाणी व हवामान आपल्याकडे चांगलेच आहे. परंतु तरुण याचा फायदा घेतांना दिसत नाही. केवळ नोकरीचा विचार करतात. जागतिक स्तरावरच नोक-यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळावे, दुध, रेशीम, शेळी पालन कुक्कूट पालनासारख्या उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.प्रा. डॉ. एम.व्ही धुमाळ यांनी कुक्कूटपालन व शेळीपालन व्यवसायातील माहिती दिली. तर रेशीम अधिकारी व्ही.एम.भांगे व प्रा. अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योगातील शेतकरी महिन्याला लाखो रुपये कसे कमावू शकतो याची माहिती स्वयंरोजगार कार्यशाळेत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी केले.यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, कॉंग्रेसचे नेते भीमराव डोंगरे, आर.आर.खडके, साईनाथ पवार, सजेर्राव बोराडे, राजेंद्र गोरे, धनराज लोंढे पाटील, महेश उफाड, सुनिल अंभोरे, सुभाष कोळकर, रघुनाथ गोल्डे, नारायणराव बोराडे, गजानन वाळके , बबनराव गाडेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, प्रा. डॉ. शिवाजी मदन, ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.