शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.स्वयंवर मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा फाऊंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कृषीपुरक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण विजय अण्णा बोराडे होते.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जगाच्या तुलनेत शेती, पाणी व हवामान आपल्याकडे चांगलेच आहे. परंतु तरुण याचा फायदा घेतांना दिसत नाही. केवळ नोकरीचा विचार करतात. जागतिक स्तरावरच नोक-यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळावे, दुध, रेशीम, शेळी पालन कुक्कूट पालनासारख्या उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.प्रा. डॉ. एम.व्ही धुमाळ यांनी कुक्कूटपालन व शेळीपालन व्यवसायातील माहिती दिली. तर रेशीम अधिकारी व्ही.एम.भांगे व प्रा. अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योगातील शेतकरी महिन्याला लाखो रुपये कसे कमावू शकतो याची माहिती स्वयंरोजगार कार्यशाळेत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी केले.यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, कॉंग्रेसचे नेते भीमराव डोंगरे, आर.आर.खडके, साईनाथ पवार, सजेर्राव बोराडे, राजेंद्र गोरे, धनराज लोंढे पाटील, महेश उफाड, सुनिल अंभोरे, सुभाष कोळकर, रघुनाथ गोल्डे, नारायणराव बोराडे, गजानन वाळके , बबनराव गाडेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, प्रा. डॉ. शिवाजी मदन, ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.