शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.स्वयंवर मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा फाऊंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कृषीपुरक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण विजय अण्णा बोराडे होते.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जगाच्या तुलनेत शेती, पाणी व हवामान आपल्याकडे चांगलेच आहे. परंतु तरुण याचा फायदा घेतांना दिसत नाही. केवळ नोकरीचा विचार करतात. जागतिक स्तरावरच नोक-यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळावे, दुध, रेशीम, शेळी पालन कुक्कूट पालनासारख्या उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.प्रा. डॉ. एम.व्ही धुमाळ यांनी कुक्कूटपालन व शेळीपालन व्यवसायातील माहिती दिली. तर रेशीम अधिकारी व्ही.एम.भांगे व प्रा. अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योगातील शेतकरी महिन्याला लाखो रुपये कसे कमावू शकतो याची माहिती स्वयंरोजगार कार्यशाळेत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी केले.यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, कॉंग्रेसचे नेते भीमराव डोंगरे, आर.आर.खडके, साईनाथ पवार, सजेर्राव बोराडे, राजेंद्र गोरे, धनराज लोंढे पाटील, महेश उफाड, सुनिल अंभोरे, सुभाष कोळकर, रघुनाथ गोल्डे, नारायणराव बोराडे, गजानन वाळके , बबनराव गाडेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, प्रा. डॉ. शिवाजी मदन, ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.