शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आॅनलाईन व्यवहार सावधपणे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:52 IST

आॅनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले.

जालना : आॅनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हे जनजागृतीबाबत माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात मंगळवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक लता फड, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक भूषण मेटकर, संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये, गणेश देशपांडे, सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांची प्रमुख उपस्थिती होती.पोकळे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विश्वास न बसणा-या जाहिरातींना बळी पडता डिजिटल व्यवहारात होणा-या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. सोशल मीडिया वापरताना त्याचा दुरुपयोग होणार नाही, तसेच मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची शिकार होणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक फड म्हणाल्या की, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. डिजिटल व्यवहार व सोशल मिडियापासून आता आपण दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करून यापासून आपण सुरक्षित कसे राहू, याबाबत काळजी घ्यावी. व्यवस्थापक मेटकर यांनी आॅनलाईन बँकिंग, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, ओटीपी, पासवर्ड सुरक्षा, आॅनलाईन खरेदी व्यवहार करताना होणारी फसवणूक, यापासून सुरक्षा म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. ई-मेल तसेच अँड्रॉईड मोबाईलवर विविध प्रलोभने देणारे मेसेज येत असतात. हा फिशिंगचा प्रकार असून, प्रलोभने दाखविणाºया ई-मेल्सला प्रतिसाद देणे टाळावे, असे सांगितले. संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये यांनी संगणक तसेच मोबाईलमधील डेटा कशा प्रकारे चोरी केला जातो, त्याला कसा प्रतिबंध घालावा, याबाबत माहिती दिली. पोलीस दलाच्या आयबाईकचे गणेश देशपांडे यांनी सायबर गुन्ह्यांची कलमे व शिक्षा याबाबत माहिती दिली. यावेळी डिजिटल व्यवहाराबाबत उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे निरसनही करण्यात आले. सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत माध्यमांनी अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहन केले.