शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आॅनलाईन व्यवहार सावधपणे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:52 IST

आॅनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले.

जालना : आॅनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हे जनजागृतीबाबत माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात मंगळवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक लता फड, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक भूषण मेटकर, संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये, गणेश देशपांडे, सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांची प्रमुख उपस्थिती होती.पोकळे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विश्वास न बसणा-या जाहिरातींना बळी पडता डिजिटल व्यवहारात होणा-या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. सोशल मीडिया वापरताना त्याचा दुरुपयोग होणार नाही, तसेच मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची शिकार होणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक फड म्हणाल्या की, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. डिजिटल व्यवहार व सोशल मिडियापासून आता आपण दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करून यापासून आपण सुरक्षित कसे राहू, याबाबत काळजी घ्यावी. व्यवस्थापक मेटकर यांनी आॅनलाईन बँकिंग, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, ओटीपी, पासवर्ड सुरक्षा, आॅनलाईन खरेदी व्यवहार करताना होणारी फसवणूक, यापासून सुरक्षा म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. ई-मेल तसेच अँड्रॉईड मोबाईलवर विविध प्रलोभने देणारे मेसेज येत असतात. हा फिशिंगचा प्रकार असून, प्रलोभने दाखविणाºया ई-मेल्सला प्रतिसाद देणे टाळावे, असे सांगितले. संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये यांनी संगणक तसेच मोबाईलमधील डेटा कशा प्रकारे चोरी केला जातो, त्याला कसा प्रतिबंध घालावा, याबाबत माहिती दिली. पोलीस दलाच्या आयबाईकचे गणेश देशपांडे यांनी सायबर गुन्ह्यांची कलमे व शिक्षा याबाबत माहिती दिली. यावेळी डिजिटल व्यवहाराबाबत उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे निरसनही करण्यात आले. सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत माध्यमांनी अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहन केले.