शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी महात्मा गांधी अध्ययन केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. सद्य:स्थितीत जेईएस महाविद्यालयाचे व्यवस्थापन खिशातून पैसे खर्च करून केंद्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे किती दिवस चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. म.गांधींच्या विचारांचा प्रसार अडचणीत आला आहे.देशातील विविध थोर विचारवंताचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने ही अध्ययन केंद्र स्थापन केली होती. त्यात जालन्यात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जेईएस महाविद्यालयाने हे केंद्र सुरू केले होते. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १४ राज्यस्तीय युवक-युवतींचे शिबिरांचे आयोजन केले होते. प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक दिग्गज विचारवंतांनी जालन्यात हजेरी लावून युवकांना मार्गदर्शन केले होते. दरम्यान महात्मा गांधीचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी या केंद्राकडून एक स्वतंत्र परीक्षा घेतली जात होती. ही परीक्षा जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. एकूणच मोठी ग्रंथ संपदा असलेले वाचनालय या केंद्रात आहे. या केंद्राच्या माध्यमातून गावाकडे चला या अंतर्गत सेद्रिंय शेती तसेच विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे. या केंद्राला २००६ पासून दरवर्षी सात लाख रूपयांचा निधी मिळत होता. तो आता तीनवर्षापासून बंद झाला आहे. एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे दाखवत असले तरी वास्तव मात्र, वेगळेच आहे. या केंद्राला निधी देण्याचा मुद्दा हा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे जेईएस महाविद्यालच्या हिरक महोत्सची कार्यक्रमाच्या शुभारंभास आले असता, त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र त्यांनीही याकडे ऐकून न एैकल्या सारखे केल्याचे दिसून येते. सर्वात मोठे दर्दैव म्हणजे हे केंद्र नेमके महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती वर्षात आर्थिक कोंडीत सापडले आहे. हे केंद्र भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबवू शकते. परंतू, केंद्र चालविण्यासाठी निधीची नितांत गरज आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीEducation Sectorशिक्षण क्षेत्र