शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

निधीअभावी महात्मा गांधी अध्ययन केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. सद्य:स्थितीत जेईएस महाविद्यालयाचे व्यवस्थापन खिशातून पैसे खर्च करून केंद्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे किती दिवस चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. म.गांधींच्या विचारांचा प्रसार अडचणीत आला आहे.देशातील विविध थोर विचारवंताचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने ही अध्ययन केंद्र स्थापन केली होती. त्यात जालन्यात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जेईएस महाविद्यालयाने हे केंद्र सुरू केले होते. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १४ राज्यस्तीय युवक-युवतींचे शिबिरांचे आयोजन केले होते. प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक दिग्गज विचारवंतांनी जालन्यात हजेरी लावून युवकांना मार्गदर्शन केले होते. दरम्यान महात्मा गांधीचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी या केंद्राकडून एक स्वतंत्र परीक्षा घेतली जात होती. ही परीक्षा जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. एकूणच मोठी ग्रंथ संपदा असलेले वाचनालय या केंद्रात आहे. या केंद्राच्या माध्यमातून गावाकडे चला या अंतर्गत सेद्रिंय शेती तसेच विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे. या केंद्राला २००६ पासून दरवर्षी सात लाख रूपयांचा निधी मिळत होता. तो आता तीनवर्षापासून बंद झाला आहे. एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे दाखवत असले तरी वास्तव मात्र, वेगळेच आहे. या केंद्राला निधी देण्याचा मुद्दा हा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे जेईएस महाविद्यालच्या हिरक महोत्सची कार्यक्रमाच्या शुभारंभास आले असता, त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र त्यांनीही याकडे ऐकून न एैकल्या सारखे केल्याचे दिसून येते. सर्वात मोठे दर्दैव म्हणजे हे केंद्र नेमके महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती वर्षात आर्थिक कोंडीत सापडले आहे. हे केंद्र भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबवू शकते. परंतू, केंद्र चालविण्यासाठी निधीची नितांत गरज आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीEducation Sectorशिक्षण क्षेत्र