शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

Maharashtra Election 2019 : वॉटर ग्रीडमुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:17 IST

मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही.

ठळक मुद्देबंजारा समाजाचे प्रश्न सोडविणारकाँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

जालना : मराठवाडा विकासासाठी मंजूर झालेला निधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाटला. त्यामुळे मराठवाड्याचा विकास आवश्यक त्या प्रमाणात झाला नाही. केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून दुष्काळ मुक्तीला महत्त्व दिले आहे. वॉटर ग्रीड योजनेमुळे आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊन सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी कलम ३७०, तिहेरी तलाक, बालाकोट एअरस्ट्राईक आदी मुदद्यांवरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ परतूर येथे बुधवारी दुपारी आयोजित सभेत मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. अर्जुन खोतकर, हिकमत उढाण, खा. संजय जाधव, आ. मोहन फड, मेघना बोर्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बबनराव लोणीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही. मागील पाच वर्षाच्या कालावधीत सरकारने विविध योजना राबवून मराठवाड्याचा विकास केला आहे. जलयुक्त शिवार ही योजना क्रांतीकारक ठरली आहे. कर्जमाफी, भारनियमनमुक्त गावांसाठी प्रयत्न झाले. जालना येथील ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडस्पार्क, औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहत झोन, कौशल्य विकास योजना याबाबींमुळे मराठवाड्याचा विकास होणार आहे. दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर ग्रीड महत्त्वकांक्षी योजना लाभदायक ठरणार आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना दुष्काळ जवळून पाहिला आहे. दुष्काळामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन नागरिकांचे स्थलांतर होते. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने जलसंवर्धनाला महत्त्व दिले असून, त्यासाठी साडेतीन लाख कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. शासनाने अल्पसंख्यांक पेन्शन योजना, आयुषमान भारत, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, शेतकरी पेन्शन, घरकूल आदी अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविताना तिहेरी तलाक, कलम ३७०, बालाकोट आदी मुदद्यांवर त्यांनी विरोध केला. त्यांची देशभक्ती केवळ त्यांच्या परिवार भक्तीत होती. आता मात्र ते पक्षीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांना राष्ट्रवादाचे धडे देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचे सरकार येणार असल्याचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत. विकास कामे होण्यासाठी केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार हावे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणारपरतूर विधानसभा मतदार संघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. याची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत समाजाला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीpartur-acपरतूरJalanaजालना