शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकमेव रणरागिणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीत

ठळक मुद्देशौचालये नावालाच, मजुरांची परिस्थिती बिकटच परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल

जालना : जालन्यातील एकेकाळची अत्यंत मोठी कंपनी म्हणून झलानी टूल्स पूर्वीची गेडोर कंपनीतील कामगार राधेश्याम शर्मा यांची मुलगी सरिता शर्मा-खंदारे या कामगार नेत्या म्हणून उदयास आल्या आणि जालना जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी उडी घेतली. जिल्ह्यातील एकमेव महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रचारादरम्यान त्या रोजगार हमीचे कामे तसेच शेतात जावून निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. परंतु परतूर मतदार संघातून सरिता शर्मा यांचा अपवाद वगळता एकही महिला रिंगणात नाही. शर्मा यांचे वडील ज्या कंपनीत होते.ती कंपनी बंद पडल्यानंतर त्या कामगारांचे आतोनात हाल सुरु होते. घरातूनच कामगारांविषयीची आस्था त्यांना मिळाल्याने तरुण वयात त्यांनी माकप पक्षात सहभाग घेतला. पक्षातील एक ओघवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सरिता शर्मा यांनी विविध आघाड्यांवर लढा दिला. शर्मा यांचा विवाह याच पक्षात कार्यरत असलेले मारुती खंदारे यांच्या सोबत झाला. त्यामुळे लग्नानंतर त्या सरिता शर्मा -खंदारे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली. त्यावेळीपासूनच त्यांच्याडे सर्वांचे लक्ष लागून होते. परतूर मतदार संघात जवळपास २३८ गावे असून आतापर्यंत त्यांनी १४० पेक्षा अधिक गावामध्ये भेटी देवून विशेष करुन महिलांशी संपर्क साधला. त्यावेळी अत्यंत विदारक चित्र त्यांना दिसून आल्याचे त्या म्हणाल्या, सरकार एकीकडे स्वच्छतेवर भर देत असून, १२ हजारांचे अनुदान शोचालय बांधणीसाठी देत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये आज पाणीच नसल्याने ही शौचालय शोभेची वस्तू बनली आहेत. रोजगार हमी योजनेची मजुरी बाजारात देण्यात येणाऱ्या मजुरीपेक्षा कमी असल्याने अडचणी आहेत. तर महिलांच्या आरोग्या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील महिला आजही अनेक आजार अंगावर काढतात. कुपोषणाचा मुद्दाही या मतदार संघात गंभीर असल्याचे दिसून आले. 

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीतइतर बडया राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे प्रचाराचा थाट-माट नसला तरी ज्या गावात जाऊ तेथे आमचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आदी गंभीर मुद्दे आजही लालफितीत आहेत. धूरमुक्त गावाचे स्वप्न केवळ सरकारच्या जाहिरातीतूनच दिसून येत असल्याचे वास्तव प्रत्यक्ष प्रचाराला गेल्यावर दिसून येते. आमच्या पक्षाचा अंजेडा गोरगरिबांचे कल्याण आणि कामगारांचे हित याला महत्व दिले. त्यामुळे पती मारोती खंदारे यांच्यासह हाडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत प्रचारात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalanaजालनाpartur-acपरतूर