शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकमेव रणरागिणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीत

ठळक मुद्देशौचालये नावालाच, मजुरांची परिस्थिती बिकटच परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल

जालना : जालन्यातील एकेकाळची अत्यंत मोठी कंपनी म्हणून झलानी टूल्स पूर्वीची गेडोर कंपनीतील कामगार राधेश्याम शर्मा यांची मुलगी सरिता शर्मा-खंदारे या कामगार नेत्या म्हणून उदयास आल्या आणि जालना जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी उडी घेतली. जिल्ह्यातील एकमेव महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रचारादरम्यान त्या रोजगार हमीचे कामे तसेच शेतात जावून निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. परंतु परतूर मतदार संघातून सरिता शर्मा यांचा अपवाद वगळता एकही महिला रिंगणात नाही. शर्मा यांचे वडील ज्या कंपनीत होते.ती कंपनी बंद पडल्यानंतर त्या कामगारांचे आतोनात हाल सुरु होते. घरातूनच कामगारांविषयीची आस्था त्यांना मिळाल्याने तरुण वयात त्यांनी माकप पक्षात सहभाग घेतला. पक्षातील एक ओघवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सरिता शर्मा यांनी विविध आघाड्यांवर लढा दिला. शर्मा यांचा विवाह याच पक्षात कार्यरत असलेले मारुती खंदारे यांच्या सोबत झाला. त्यामुळे लग्नानंतर त्या सरिता शर्मा -खंदारे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली. त्यावेळीपासूनच त्यांच्याडे सर्वांचे लक्ष लागून होते. परतूर मतदार संघात जवळपास २३८ गावे असून आतापर्यंत त्यांनी १४० पेक्षा अधिक गावामध्ये भेटी देवून विशेष करुन महिलांशी संपर्क साधला. त्यावेळी अत्यंत विदारक चित्र त्यांना दिसून आल्याचे त्या म्हणाल्या, सरकार एकीकडे स्वच्छतेवर भर देत असून, १२ हजारांचे अनुदान शोचालय बांधणीसाठी देत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये आज पाणीच नसल्याने ही शौचालय शोभेची वस्तू बनली आहेत. रोजगार हमी योजनेची मजुरी बाजारात देण्यात येणाऱ्या मजुरीपेक्षा कमी असल्याने अडचणी आहेत. तर महिलांच्या आरोग्या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील महिला आजही अनेक आजार अंगावर काढतात. कुपोषणाचा मुद्दाही या मतदार संघात गंभीर असल्याचे दिसून आले. 

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीतइतर बडया राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे प्रचाराचा थाट-माट नसला तरी ज्या गावात जाऊ तेथे आमचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आदी गंभीर मुद्दे आजही लालफितीत आहेत. धूरमुक्त गावाचे स्वप्न केवळ सरकारच्या जाहिरातीतूनच दिसून येत असल्याचे वास्तव प्रत्यक्ष प्रचाराला गेल्यावर दिसून येते. आमच्या पक्षाचा अंजेडा गोरगरिबांचे कल्याण आणि कामगारांचे हित याला महत्व दिले. त्यामुळे पती मारोती खंदारे यांच्यासह हाडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत प्रचारात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalanaजालनाpartur-acपरतूर