शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकमेव रणरागिणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीत

ठळक मुद्देशौचालये नावालाच, मजुरांची परिस्थिती बिकटच परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल

जालना : जालन्यातील एकेकाळची अत्यंत मोठी कंपनी म्हणून झलानी टूल्स पूर्वीची गेडोर कंपनीतील कामगार राधेश्याम शर्मा यांची मुलगी सरिता शर्मा-खंदारे या कामगार नेत्या म्हणून उदयास आल्या आणि जालना जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी उडी घेतली. जिल्ह्यातील एकमेव महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रचारादरम्यान त्या रोजगार हमीचे कामे तसेच शेतात जावून निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. परंतु परतूर मतदार संघातून सरिता शर्मा यांचा अपवाद वगळता एकही महिला रिंगणात नाही. शर्मा यांचे वडील ज्या कंपनीत होते.ती कंपनी बंद पडल्यानंतर त्या कामगारांचे आतोनात हाल सुरु होते. घरातूनच कामगारांविषयीची आस्था त्यांना मिळाल्याने तरुण वयात त्यांनी माकप पक्षात सहभाग घेतला. पक्षातील एक ओघवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सरिता शर्मा यांनी विविध आघाड्यांवर लढा दिला. शर्मा यांचा विवाह याच पक्षात कार्यरत असलेले मारुती खंदारे यांच्या सोबत झाला. त्यामुळे लग्नानंतर त्या सरिता शर्मा -खंदारे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली. त्यावेळीपासूनच त्यांच्याडे सर्वांचे लक्ष लागून होते. परतूर मतदार संघात जवळपास २३८ गावे असून आतापर्यंत त्यांनी १४० पेक्षा अधिक गावामध्ये भेटी देवून विशेष करुन महिलांशी संपर्क साधला. त्यावेळी अत्यंत विदारक चित्र त्यांना दिसून आल्याचे त्या म्हणाल्या, सरकार एकीकडे स्वच्छतेवर भर देत असून, १२ हजारांचे अनुदान शोचालय बांधणीसाठी देत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये आज पाणीच नसल्याने ही शौचालय शोभेची वस्तू बनली आहेत. रोजगार हमी योजनेची मजुरी बाजारात देण्यात येणाऱ्या मजुरीपेक्षा कमी असल्याने अडचणी आहेत. तर महिलांच्या आरोग्या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील महिला आजही अनेक आजार अंगावर काढतात. कुपोषणाचा मुद्दाही या मतदार संघात गंभीर असल्याचे दिसून आले. 

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीतइतर बडया राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे प्रचाराचा थाट-माट नसला तरी ज्या गावात जाऊ तेथे आमचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आदी गंभीर मुद्दे आजही लालफितीत आहेत. धूरमुक्त गावाचे स्वप्न केवळ सरकारच्या जाहिरातीतूनच दिसून येत असल्याचे वास्तव प्रत्यक्ष प्रचाराला गेल्यावर दिसून येते. आमच्या पक्षाचा अंजेडा गोरगरिबांचे कल्याण आणि कामगारांचे हित याला महत्व दिले. त्यामुळे पती मारोती खंदारे यांच्यासह हाडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत प्रचारात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalanaजालनाpartur-acपरतूर