शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. ...

जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने भविष्यात पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन आतापासून केले आहे.

जालना जिल्ह्यात गोदावरी काठावरील ३८ गावे हेे पूररेषेजवळ येतात. त्यामुळे या गावांमध्ये अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. गोदावरीप्रमाणेच जिल्ह्यातील पूर्णा नदीला देखील पूर येण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने त्या त्या तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. पूर नियंत्रण करण्यासाठी पूररेषा निश्चित केली जाते. साधारणपणे नदीपात्रापासून १०० मीटरच्या अंतरावर ही पूररेषा आखली जाते.

जिल्ह्यातील ३८ गावांची पूररेषा निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी आपत्ती निवारण विभागाने सर्व ती तयारी केली आहे. सरासरी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यादृष्टीने लागणारे सर्व बचाव साहित्याची जुळवाजुळव पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीपात्रांजवळील जवळपास ३८ गावांमधील ८०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राला नदीपात्रातून पाणी गाव, शेतात घुसल्यास फटका बसू शकतो. त्यादृष्टीने या भागातील शेतकऱ्यांना २४ तास आधीच सतर्क केले जाते. मध्यम आणि मोठ्या जलसाठ्यांमधील पाणी पातळीची नोंद ही तातडीने घेऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. असे असले तरी जोपर्यंत जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात नाही. तोपर्यंत जिल्ह्याला पुराचे संकट खूप कमी असते, तरीदेखील आम्ही खबरदारी घेऊन सर्व ते बचाव साहित्य उपलब्ध केले आहे.

-केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी

शहरातील धोकादायक इमारतीची सर्वेक्षण सुरू

जालना शहरातील धोकादायक इमारतींचे जालना पालिकेकडून स्वतंत्र सर्वेक्षण केले जात आहे. येत्या पंधरा दिवसांत याचा अहवाल अपेक्षित आहे.

जालन्याप्रमाणेच पूररेषेजवळील जी ३८ गावे आहेत, तेथील जुने बांधकाम असलेल्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुराचा इशारा दिल्यानंतर त्या भागात न जाण्यासाठी नदीपात्रात धोका दर्शविणारे फलक लावण्याचे निर्देशही दिले आहेत.

अग्निशमन दल सज्ज

जालना जिल्ह्यात जवळपास पाच ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. या दलाकडे अग्निशमन बंबांसह लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.

जालना, अंबड, भोकरदन, परतूर येथे अग्निशमन केंद्र असून अंकुशनगर येथील समर्थ कारखान्याकडेही एक अग्निशमन बंब आहे.

अग्निशमन दलाकडे बंब असले तरी अधिकच्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसून येते.