शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
4
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
5
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
6
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
7
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
8
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
9
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
10
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
11
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
12
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
13
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
14
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
15
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
16
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
17
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
18
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
19
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
20
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. ...

जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने भविष्यात पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन आतापासून केले आहे.

जालना जिल्ह्यात गोदावरी काठावरील ३८ गावे हेे पूररेषेजवळ येतात. त्यामुळे या गावांमध्ये अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. गोदावरीप्रमाणेच जिल्ह्यातील पूर्णा नदीला देखील पूर येण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने त्या त्या तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. पूर नियंत्रण करण्यासाठी पूररेषा निश्चित केली जाते. साधारणपणे नदीपात्रापासून १०० मीटरच्या अंतरावर ही पूररेषा आखली जाते.

जिल्ह्यातील ३८ गावांची पूररेषा निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी आपत्ती निवारण विभागाने सर्व ती तयारी केली आहे. सरासरी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यादृष्टीने लागणारे सर्व बचाव साहित्याची जुळवाजुळव पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीपात्रांजवळील जवळपास ३८ गावांमधील ८०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राला नदीपात्रातून पाणी गाव, शेतात घुसल्यास फटका बसू शकतो. त्यादृष्टीने या भागातील शेतकऱ्यांना २४ तास आधीच सतर्क केले जाते. मध्यम आणि मोठ्या जलसाठ्यांमधील पाणी पातळीची नोंद ही तातडीने घेऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. असे असले तरी जोपर्यंत जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात नाही. तोपर्यंत जिल्ह्याला पुराचे संकट खूप कमी असते, तरीदेखील आम्ही खबरदारी घेऊन सर्व ते बचाव साहित्य उपलब्ध केले आहे.

-केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी

शहरातील धोकादायक इमारतीची सर्वेक्षण सुरू

जालना शहरातील धोकादायक इमारतींचे जालना पालिकेकडून स्वतंत्र सर्वेक्षण केले जात आहे. येत्या पंधरा दिवसांत याचा अहवाल अपेक्षित आहे.

जालन्याप्रमाणेच पूररेषेजवळील जी ३८ गावे आहेत, तेथील जुने बांधकाम असलेल्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुराचा इशारा दिल्यानंतर त्या भागात न जाण्यासाठी नदीपात्रात धोका दर्शविणारे फलक लावण्याचे निर्देशही दिले आहेत.

अग्निशमन दल सज्ज

जालना जिल्ह्यात जवळपास पाच ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. या दलाकडे अग्निशमन बंबांसह लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.

जालना, अंबड, भोकरदन, परतूर येथे अग्निशमन केंद्र असून अंकुशनगर येथील समर्थ कारखान्याकडेही एक अग्निशमन बंब आहे.

अग्निशमन दलाकडे बंब असले तरी अधिकच्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसून येते.