शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांनी शेतक-यांचे शब्द व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : देशातील स्त्री आणि शेतकरी संकटात सापडलेले असून ते फारसे व्यक्तही होऊ शकत नाहीत. साहित्यिकांनी त्यांचे शब्द होण्याची गरज आहे. यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉ. अमर हबीब यांनी केले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष साहित्यिक ललित अधाने, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, स्वागताध्यक्ष शाम सिरसाट, गझलकार सुनंदा पाटील, सामाजसेवक दत्ता बारगजे, माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव, मराठवाडा युवा साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर, मंडळाचे सचिव अच्युत मोरे, कोषाध्यक्ष साहिल पाटील, शाहीर आप्पासाहेब उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.अमर हबीब म्हणाले की, साहित्यकांनी सृजनांचा वाली झाले पाहिजे. प्रत्येकातले माणूसपण जागे झाल्याशिवाय ख-या साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही. हा जिल्हा हा आतापर्यंत कसदार बियाणे उत्पादनांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु यापुढे हा जिल्हा साहित्याचे कसदार बियाणे असलेला जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले. साहित्याच्या माध्यमातून सत्याची मांडणी केली पाहिजे. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी साहित्यिकांचे फार मोठे योगदान आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम सिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाला पालखीत नाही तर डोक्यात घेण्याची गरज असून, युवकांनी सामाजिक भावनेतून सकारात्मक कार्यात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या पदाधिका-यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनानिमित्त दिवसभरात कविसंमेलन, परिसंवाद, पुरस्कार वितरण इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.--------------युवकच बदल घडवू शकतात - ललित अधानेसंमेलनाध्यक्ष डॉ.ललित अधाने म्हणाले, की जगातील सर्व क्रांतिकारक बदल युवकांनी घडवून आणले आहेत. देश घडवण्यात तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या देशाच्या विकासाचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा त्या देशाची शिक्षणव्यवस्था कशी आहे? त्या देशातला तरुण स्वहित व देशहिताकरिता कितपत गंभीर आहे? तो काय करतो? त्या देशातील साहित्य किती गंभीरपणे लिहिले वाचले जाते, यावर केले जाते. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे संमेलनाच्या आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले.-------