शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:45 IST

शासनाने सेवा हमी कायदा मंजूर केला. पण त्याची कोणतीही फलनिष्पती जिल्ह्यात झालेली नाही. सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच रेंगाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय कामासाठी सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये. त्यांची कामे वेळेत व्हावी म्हणून शासनाने सेवा हमी कायदा मंजूर केला. पण त्याची कोणतीही फलनिष्पती जिल्ह्यात झालेली नाही. सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच रेंगाळला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे करण्यात आली. त्यानी लागलीच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र, भोकरदन आणि मंठा वगळता इतर तालुक्यात जिल्हाधिका-यांचे आदेश धाब्यावर बसवले आहेत. सहा जिल्ह्यात अद्याप दक्षता पथकेच स्थापन करण्यात आलेली नाही.‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ ही म्हण बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये आजही लागू होते. शासकीय कामे करुन घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. संबंधित सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांची जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी सेवा हमी कायद्याची निर्माण झाली. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि कामात सुसूत्रता यावी यासाठी हा सेवा हमी कायदा बनविला गेला.राज्य सरकारने सभागृहात हा कायदाही मंजूर केला. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यास कार्यालयीन वेळेत कर्मचारी वा अधिकारी हजर असल्याचे दिसून येत नाहीत. मनमानी कारभाला आळा घालण्यासाठी या कायद्याची गरज निर्माण झाली खरी, मात्र तो तूर्तास तरी कागदावरच आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जोंधळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दक्षता पथक नेमून शासकीय कार्यालयांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तहसीलदार आणि चार महसूल विभागांचे उपविभागीय अधिका-यांना ४ नोव्हेंबर रोजी तसे लेखी पत्रही दिले गेले. भोकरदन व मंठा येथे दक्षता पथक स्थापन केले गेले. काही शासकीय कार्यालयांचे पंचनामेही करण्यात आले. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणा-या अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र, याबाबतचा अहवाल अद्याप जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आलेला नाही. तसेच कार्यवाहीची पुढील दिशाही स्पष्ट झालेली नाही. विशेष म्हणजे पाच तालुक्यात ही पथकेच स्थापन करण्यात आलेली नाहीत. वरिष्ठ अधिकारीच या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल उदासीन आहेत. मग अधिकारी आणि कर्मचा-यांवर धाक कसा राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.