शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:45 IST

शासनाने सेवा हमी कायदा मंजूर केला. पण त्याची कोणतीही फलनिष्पती जिल्ह्यात झालेली नाही. सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच रेंगाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय कामासाठी सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये. त्यांची कामे वेळेत व्हावी म्हणून शासनाने सेवा हमी कायदा मंजूर केला. पण त्याची कोणतीही फलनिष्पती जिल्ह्यात झालेली नाही. सेवेची हमी देणारा कायदा कागदावरच रेंगाळला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे करण्यात आली. त्यानी लागलीच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र, भोकरदन आणि मंठा वगळता इतर तालुक्यात जिल्हाधिका-यांचे आदेश धाब्यावर बसवले आहेत. सहा जिल्ह्यात अद्याप दक्षता पथकेच स्थापन करण्यात आलेली नाही.‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ ही म्हण बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये आजही लागू होते. शासकीय कामे करुन घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. संबंधित सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांची जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी सेवा हमी कायद्याची निर्माण झाली. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि कामात सुसूत्रता यावी यासाठी हा सेवा हमी कायदा बनविला गेला.राज्य सरकारने सभागृहात हा कायदाही मंजूर केला. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यास कार्यालयीन वेळेत कर्मचारी वा अधिकारी हजर असल्याचे दिसून येत नाहीत. मनमानी कारभाला आळा घालण्यासाठी या कायद्याची गरज निर्माण झाली खरी, मात्र तो तूर्तास तरी कागदावरच आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जोंधळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दक्षता पथक नेमून शासकीय कार्यालयांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तहसीलदार आणि चार महसूल विभागांचे उपविभागीय अधिका-यांना ४ नोव्हेंबर रोजी तसे लेखी पत्रही दिले गेले. भोकरदन व मंठा येथे दक्षता पथक स्थापन केले गेले. काही शासकीय कार्यालयांचे पंचनामेही करण्यात आले. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणा-या अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र, याबाबतचा अहवाल अद्याप जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आलेला नाही. तसेच कार्यवाहीची पुढील दिशाही स्पष्ट झालेली नाही. विशेष म्हणजे पाच तालुक्यात ही पथकेच स्थापन करण्यात आलेली नाहीत. वरिष्ठ अधिकारीच या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल उदासीन आहेत. मग अधिकारी आणि कर्मचा-यांवर धाक कसा राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.