शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आयत्या बिळात नागोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:59 IST

पालिकेने खेळाचे मैदान, माध्यमिक शाळा आणि उद्यानासाठी खाजगी मालकी असलेली सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन संपादित केली होती. यावर खाजगी व्यक्तीने कब्जा केला असल्याचे दिसून येते.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर परिषदेच्या मालकीच्या जागांची अद्ययावत माहितीच पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे उघडकीस येत असून, पालिकेने खेळाचे मैदान, माध्यमिक शाळा आणि उद्यानासाठी खाजगी मालकी असलेली सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन संपादित केली होती. यावर खाजगी व्यक्तीने कब्जा केला असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचे अतिक्रमण अनेक भूखंडांवर झाले असून, ते मोकळे करुन मूलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी स्थानिक प्रशासनासह पालिकेचे विश्वस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना प्रयत्न करावे लागणार आहे.आगामी २५ वर्षांचा विचार करता शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. यानुसार नागरिकांसाठी मूलभूत सुविधा म्हणून उद्यान, खेळाचे मैदान, शाळा इ. सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने काही खाजगी मालमत्ता संपादित करण्यात आल्या होत्या. यापोटी भूसंपादन कायद्यान्वये संबंधित व्यक्तींना मावेजा देण्यात आला.जालना शहर व परिसरात मोक्याच्या ठिकाणी पालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड असून, यांवर खाजगी व्यक्तींनी ताबा मिळविलेला आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाकडून हे भूखंड ताब्यात घेण्यासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरात असे अनेक भूखंड असून, पालिकेच्या वतीने आरक्षण टाकण्यात आल्यानंतर ती सेवा तेथे सुरू करण्यात आली नाही. ती जागा मूळ मालकाला परत केली जाऊ शकते. मात्र, सध्या या भूखंडांवर खाजगी व्यक्तींनी ताबा केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन पालिकेने १९९१ मध्ये माध्यमिक शाळा, उद्यान आणि खेळाच्या मैदानासाठी संपादित केली होती. याचे जागेचे मालक सुंदरदास कामत यांच्याकडून ही जमीन पालिकेने घेतली.मात्र, गत पंचवीस वर्षांत पालिकेने येथे ना शाळा उभारली ना उद्यान विकसित केले आणि ना ही खेळाचे मैदान तयार केले. दरम्यान, ही जागा खाजगी व्यक्तींनी बळकावली आहे. तब्बल दहा एकर अकरा आर जमीन पालिकेची मालमत्ता असली तरी याकडे ना अधिका-यांचे, ना नगरसेवकांचे लक्ष आहे.असे अनेक भूखंड खाजगी व्यक्तींनी बळकावले असून, ते ताब्यात घेऊन नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यात पुढे काय कारवाई करतात, याकडे जालनेकरांचे लक्ष लागून आहे.