शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

आयत्या बिळात नागोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:59 IST

पालिकेने खेळाचे मैदान, माध्यमिक शाळा आणि उद्यानासाठी खाजगी मालकी असलेली सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन संपादित केली होती. यावर खाजगी व्यक्तीने कब्जा केला असल्याचे दिसून येते.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर परिषदेच्या मालकीच्या जागांची अद्ययावत माहितीच पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे उघडकीस येत असून, पालिकेने खेळाचे मैदान, माध्यमिक शाळा आणि उद्यानासाठी खाजगी मालकी असलेली सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन संपादित केली होती. यावर खाजगी व्यक्तीने कब्जा केला असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचे अतिक्रमण अनेक भूखंडांवर झाले असून, ते मोकळे करुन मूलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी स्थानिक प्रशासनासह पालिकेचे विश्वस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना प्रयत्न करावे लागणार आहे.आगामी २५ वर्षांचा विचार करता शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. यानुसार नागरिकांसाठी मूलभूत सुविधा म्हणून उद्यान, खेळाचे मैदान, शाळा इ. सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने काही खाजगी मालमत्ता संपादित करण्यात आल्या होत्या. यापोटी भूसंपादन कायद्यान्वये संबंधित व्यक्तींना मावेजा देण्यात आला.जालना शहर व परिसरात मोक्याच्या ठिकाणी पालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड असून, यांवर खाजगी व्यक्तींनी ताबा मिळविलेला आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाकडून हे भूखंड ताब्यात घेण्यासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरात असे अनेक भूखंड असून, पालिकेच्या वतीने आरक्षण टाकण्यात आल्यानंतर ती सेवा तेथे सुरू करण्यात आली नाही. ती जागा मूळ मालकाला परत केली जाऊ शकते. मात्र, सध्या या भूखंडांवर खाजगी व्यक्तींनी ताबा केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन पालिकेने १९९१ मध्ये माध्यमिक शाळा, उद्यान आणि खेळाच्या मैदानासाठी संपादित केली होती. याचे जागेचे मालक सुंदरदास कामत यांच्याकडून ही जमीन पालिकेने घेतली.मात्र, गत पंचवीस वर्षांत पालिकेने येथे ना शाळा उभारली ना उद्यान विकसित केले आणि ना ही खेळाचे मैदान तयार केले. दरम्यान, ही जागा खाजगी व्यक्तींनी बळकावली आहे. तब्बल दहा एकर अकरा आर जमीन पालिकेची मालमत्ता असली तरी याकडे ना अधिका-यांचे, ना नगरसेवकांचे लक्ष आहे.असे अनेक भूखंड खाजगी व्यक्तींनी बळकावले असून, ते ताब्यात घेऊन नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यात पुढे काय कारवाई करतात, याकडे जालनेकरांचे लक्ष लागून आहे.