शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे अपहरण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:26 IST

फोटो सदर बाजार पोलिसांची कारवाई; सातारा येथून ९ आरोपींना अटक जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे ...

फोटो

सदर बाजार पोलिसांची कारवाई; सातारा येथून ९ आरोपींना अटक

जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेऊन गेलेल्या नऊजणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वैभव भैरू पाटील (वय २१, रा. तिरपण्या, जि. कोल्हापूर), सतीश गराडे (२३, रा. आमनेवाडी, जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (२९, रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६, रा. युलूर, जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे (३५, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे, जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊजणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीतून घेऊन गेले. या प्रकरणी तरुणाच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगावमार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा, कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पो. नि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.

नोकरी लावून देतो म्हणून घेतली मूळ कागदपत्रे

अपहरण झालेला विठ्ठल जारवाल हा सातारा येथील बहिणीच्या घरी गेला होता. तेव्हाच येथील वैभव शेशवारे याच्यासोबत त्याची ओळख झाली. यावेळीच माझे दिल्ली येथे नातेवाईक मंत्री आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो. आम्ही डमी उमेदवार बसवून परीक्षा पास करून घेतो, असे सांगून जारवालने संबंधित तरुणाची मूळ कागदपत्रे घेतली. नंतर जारवाल हा टाळाटाळ करीत असल्याने वैभव शेशवारे याने त्याला कागदपत्रांची मागणी केली. तुला कागदपत्र पाहिजे असेल तर मला पैसे दे, असे म्हणून विठ्ठल जारवालने वेळोवेळी पैसेसुद्धा घेतले; परंतु तरीही त्याने कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली. नंतर जालना येथील बसस्थानकात बोलवून त्याचे अपहरण केले.

अपहरण केलेल्या तरुणाकडून कागदपत्र जप्त

सर्व आरोपी हे सातारा येथे सिक्युरिटी म्हणून काम करतात. सरकारी नोकरी मिळण्यासाठी त्यांनी अपहरण झालेल्या इसमास मूळ कागदपत्र दिली होती. जारवाल याने आरोपींकडून लाखो रुपये घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जारवाल याच्याकडून संबंधित तरुणांची कागदपत्रे जप्त केली. विठ्ठल जारवालविरुद्ध आरोपीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.