शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:48 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१७-१८ साठी १४९ गावांची निवड झाली आहे. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी, ग्रामसभा झाल्यानंतर कामांचा गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागांतर्गत नाला-खोलीकरण, रुंदीकरण, सलग समतल चर खोदणे, बांध-बंदिस्ती, सिमेंट नाला बांध, रिचार्ज शॉफ्ट इ. दोन हजार ५५४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे ९३ कोटी ४८ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. पैकी दोन हजार ३४६ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली एक हजार ७०४ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली असून, ९८६ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत चार कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मात्र, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव, तसेच कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होत नसल्याने अद्याप दोन हजारांवर कामे अपूर्ण आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये मंजूर चार हजार ६८० कामांपैकी २२० कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे मार्चअखेर पूर्ण न केल्यास त्यासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियान समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.विभागीय आयुक्त घेणार आढावाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी पूर्ण-अपूर्ण कामांच्या माहितीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांवर चार कोटी ६५ लाख ९४ हजार रुपये खर्च झाले आहेत. कृषी विभागाने सर्वाधिक ४२३ कामांवर तीन कोटी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत. जलसंधारण, लघु पाटबंधारे, जलसंपदा या विभागांनी अद्याप मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केलेले नाही.