शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:48 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१७-१८ साठी १४९ गावांची निवड झाली आहे. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी, ग्रामसभा झाल्यानंतर कामांचा गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागांतर्गत नाला-खोलीकरण, रुंदीकरण, सलग समतल चर खोदणे, बांध-बंदिस्ती, सिमेंट नाला बांध, रिचार्ज शॉफ्ट इ. दोन हजार ५५४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे ९३ कोटी ४८ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. पैकी दोन हजार ३४६ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली एक हजार ७०४ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली असून, ९८६ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत चार कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मात्र, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव, तसेच कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होत नसल्याने अद्याप दोन हजारांवर कामे अपूर्ण आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये मंजूर चार हजार ६८० कामांपैकी २२० कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे मार्चअखेर पूर्ण न केल्यास त्यासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियान समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.विभागीय आयुक्त घेणार आढावाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी पूर्ण-अपूर्ण कामांच्या माहितीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांवर चार कोटी ६५ लाख ९४ हजार रुपये खर्च झाले आहेत. कृषी विभागाने सर्वाधिक ४२३ कामांवर तीन कोटी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत. जलसंधारण, लघु पाटबंधारे, जलसंपदा या विभागांनी अद्याप मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केलेले नाही.