शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:48 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१७-१८ साठी १४९ गावांची निवड झाली आहे. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी, ग्रामसभा झाल्यानंतर कामांचा गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागांतर्गत नाला-खोलीकरण, रुंदीकरण, सलग समतल चर खोदणे, बांध-बंदिस्ती, सिमेंट नाला बांध, रिचार्ज शॉफ्ट इ. दोन हजार ५५४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे ९३ कोटी ४८ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. पैकी दोन हजार ३४६ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली एक हजार ७०४ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली असून, ९८६ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत चार कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मात्र, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव, तसेच कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होत नसल्याने अद्याप दोन हजारांवर कामे अपूर्ण आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये मंजूर चार हजार ६८० कामांपैकी २२० कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे मार्चअखेर पूर्ण न केल्यास त्यासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियान समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.विभागीय आयुक्त घेणार आढावाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी पूर्ण-अपूर्ण कामांच्या माहितीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांवर चार कोटी ६५ लाख ९४ हजार रुपये खर्च झाले आहेत. कृषी विभागाने सर्वाधिक ४२३ कामांवर तीन कोटी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत. जलसंधारण, लघु पाटबंधारे, जलसंपदा या विभागांनी अद्याप मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केलेले नाही.