शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘स्वच्छता अ‍ॅप’ कडे स्मार्ट जालनेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:45 IST

आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : शहरातील स्वच्छतेबाबत कायम ओरड होत असली तरी आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मिनिटाला फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस चेक करणारी युवा पिढीही स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.स्मार्टफोनच्या जमान्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आॅनलाइन व्यस्त आहे. त्यामुळे नागरिकांना थेट मोबाईलवरच अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील अस्वच्छतेबाबत तक्रार करता यावी. तसेच सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध व्हावे, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले. महापालिका, नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे याकरिता व्यापक जनजागृती केली जात आहे. जालना नगर पालिकेने नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तीन लाख लोकसंख्येपैकी आठवडाभरात केवळ दीड हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे हे प्रमाण ०.५ टक्के आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत नसला तरी शहर स्वच्छतेवर कायम ओरड होणाºया जालनावासियांनी अ‍ॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तक्रार करण्यास उदासीनता भूमिका घेतली आहे. जालना शहरातील सहा हजार नागरिक पहिल्या आठवड्यात अ‍ॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाºयांना होती. परंतु नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगत फिरण्याची वेळ आता पालिका कर्मचाºयांवर आली आहे. जालना एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याबाबत खंत व्यक्त केली. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी वेळेत सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.-----------स्वच्छता अ‍ॅपचे महत्त्व काय ?स्वच्छतेबाबतीत जालन्याचा देशातील क्रमांक ३३७ वा आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्यास स्वच्छतेच्या मानांकनात वाढ होणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आॅनलाइन तक्रारी दाखल केल्यास त्या पालिकेच्या पथकाला चोवीस तासांत तक्रार निवारण करून त्याचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या चार हजारांपैकी अधिकाधिक गुण मिळणार आहेत. भविष्यातील विकास कामांचा निधी मिळण्यास यास फायदा होणार आहे.