शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘स्वच्छता अ‍ॅप’ कडे स्मार्ट जालनेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:45 IST

आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : शहरातील स्वच्छतेबाबत कायम ओरड होत असली तरी आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मिनिटाला फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस चेक करणारी युवा पिढीही स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.स्मार्टफोनच्या जमान्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आॅनलाइन व्यस्त आहे. त्यामुळे नागरिकांना थेट मोबाईलवरच अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील अस्वच्छतेबाबत तक्रार करता यावी. तसेच सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध व्हावे, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले. महापालिका, नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे याकरिता व्यापक जनजागृती केली जात आहे. जालना नगर पालिकेने नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तीन लाख लोकसंख्येपैकी आठवडाभरात केवळ दीड हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे हे प्रमाण ०.५ टक्के आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत नसला तरी शहर स्वच्छतेवर कायम ओरड होणाºया जालनावासियांनी अ‍ॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तक्रार करण्यास उदासीनता भूमिका घेतली आहे. जालना शहरातील सहा हजार नागरिक पहिल्या आठवड्यात अ‍ॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाºयांना होती. परंतु नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगत फिरण्याची वेळ आता पालिका कर्मचाºयांवर आली आहे. जालना एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याबाबत खंत व्यक्त केली. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी वेळेत सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.-----------स्वच्छता अ‍ॅपचे महत्त्व काय ?स्वच्छतेबाबतीत जालन्याचा देशातील क्रमांक ३३७ वा आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्यास स्वच्छतेच्या मानांकनात वाढ होणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आॅनलाइन तक्रारी दाखल केल्यास त्या पालिकेच्या पथकाला चोवीस तासांत तक्रार निवारण करून त्याचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या चार हजारांपैकी अधिकाधिक गुण मिळणार आहेत. भविष्यातील विकास कामांचा निधी मिळण्यास यास फायदा होणार आहे.