शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, ...

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, गूळ, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आदी वस्तूंच्या दरात मात्र मंदी आली.

अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री फार्मला लागणाऱ्या बाजरी व मक्याची मागणी सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घटली. परिणामी, व्यापारी हवालदिल झाले. बाजरी व मक्याच्या दरात सध्या क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची मंदी आली आहे. बाजरीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १०६० ते १५०० रुपये प्रति क्विंटल आणि मक्याची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, भाव ११२५ ते १२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नवीन मका येण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रवगळता इतर सर्व राज्यांमध्ये मक्यांचा साठा अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात मक्याच्या दरामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

नाफेडच्या वतीने तुरीचे टेंडर नुकतेच जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दराचे टेंडर (५६१६ रुपये) जालना बाजारपेठेतील व्यापाऱ्याचे असल्याचे बोलले जाते. सध्या तुरीची आवक दररोज ८ हजार पोती इतकी असून, भाव स्थिर म्हणजे ५२०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. भविष्यात सोयाबीनच दर चढेच राहतील, असे जाणकारांना वाटते.

हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ३ हजार भेली इतकी असून, २०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव २५०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर क्विंटलमागे २० रुपयांनी कमी झाले असून, भाव ३२८० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये क्विंटलमागे ३०० रुपयांची मंदी आली. पामतेल ११८००, सोयाबीन तेल १२५०० आणि सरकी तेलाचे दर १२२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.