शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, ...

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, गूळ, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आदी वस्तूंच्या दरात मात्र मंदी आली.

अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री फार्मला लागणाऱ्या बाजरी व मक्याची मागणी सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घटली. परिणामी, व्यापारी हवालदिल झाले. बाजरी व मक्याच्या दरात सध्या क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची मंदी आली आहे. बाजरीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १०६० ते १५०० रुपये प्रति क्विंटल आणि मक्याची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, भाव ११२५ ते १२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नवीन मका येण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रवगळता इतर सर्व राज्यांमध्ये मक्यांचा साठा अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात मक्याच्या दरामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

नाफेडच्या वतीने तुरीचे टेंडर नुकतेच जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दराचे टेंडर (५६१६ रुपये) जालना बाजारपेठेतील व्यापाऱ्याचे असल्याचे बोलले जाते. सध्या तुरीची आवक दररोज ८ हजार पोती इतकी असून, भाव स्थिर म्हणजे ५२०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. भविष्यात सोयाबीनच दर चढेच राहतील, असे जाणकारांना वाटते.

हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ३ हजार भेली इतकी असून, २०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव २५०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर क्विंटलमागे २० रुपयांनी कमी झाले असून, भाव ३२८० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये क्विंटलमागे ३०० रुपयांची मंदी आली. पामतेल ११८००, सोयाबीन तेल १२५०० आणि सरकी तेलाचे दर १२२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.