शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, ...

जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, गूळ, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आदी वस्तूंच्या दरात मात्र मंदी आली.

अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री फार्मला लागणाऱ्या बाजरी व मक्याची मागणी सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घटली. परिणामी, व्यापारी हवालदिल झाले. बाजरी व मक्याच्या दरात सध्या क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची मंदी आली आहे. बाजरीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १०६० ते १५०० रुपये प्रति क्विंटल आणि मक्याची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, भाव ११२५ ते १२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नवीन मका येण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रवगळता इतर सर्व राज्यांमध्ये मक्यांचा साठा अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात मक्याच्या दरामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

नाफेडच्या वतीने तुरीचे टेंडर नुकतेच जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दराचे टेंडर (५६१६ रुपये) जालना बाजारपेठेतील व्यापाऱ्याचे असल्याचे बोलले जाते. सध्या तुरीची आवक दररोज ८ हजार पोती इतकी असून, भाव स्थिर म्हणजे ५२०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. भविष्यात सोयाबीनच दर चढेच राहतील, असे जाणकारांना वाटते.

हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ३ हजार भेली इतकी असून, २०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव २५०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर क्विंटलमागे २० रुपयांनी कमी झाले असून, भाव ३२८० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये क्विंटलमागे ३०० रुपयांची मंदी आली. पामतेल ११८००, सोयाबीन तेल १२५०० आणि सरकी तेलाचे दर १२२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.