शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

(संजय लव्हाडे) जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास ...

(संजय लव्हाडे)

जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास अनुत्सुक आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सीसीआयचे खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. किराणा व धान्य बाजारात ग्राहकी चांगली असून, धान्य मालाचे भाव स्थिर, तर बहुतांश किराणा मालाच्या दरात तेजी आहे. सोने तोळ्यामागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, चांदीचे दर स्थिर आहेत.️ सीसीआयच्या तुलनेत खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना सोयीचे आणि फायदेशीर वाटू लागले आहे. सीसीआयकडे कापसाचा खरेदी दर ५,७२५ रुपये, तर खाजगी व्यापाऱ्यांकडे ६,००० ते ६,१०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. सीआयकडे कापसाच्या पैशासाठी थांबावे लागते, तर खाजगी व्यापारी लगेच कापसाचे पैसे देतात. या कारणामुळे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्रात शेतकरी फिरकेनासे झाले. यामुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. सर्व प्रकारचे खाद्यतेल क्विंटलमागे २०० रुपयांनी महागले. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या भडकलेल्या किमती आणि स्थानिक बाजारात तेलाची वाढती मागणी यामुळे तेलाच्या दरात तेजी आली. पामतेल ११,७००, सोयाबीन तेल १२,१००, सरकी तेल १२,००० आणि करडी तेलाचे दर १७,००० ते १८,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तूप महागले असून, डब्यामागे १०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव १,४५० ते १,७०० रुपये प्रतिडबा असे आहेत. शेंगदाण्यात १०० रुपयांची, साबुदाण्याच्या दरात ४०० रुपयांची तेजी आली. शेंगदाण्याचे दर ८,५०० ते १०,०००, तर साबुदाण्याचे दर ४,५०० ते ५,२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. नवा गहू आणि ज्वारी बाजारात आली आहे. गव्हाची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव स्थिर म्हणजे १,६५० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ४०० पोती असून, भाव १,३०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तुरीची आवक दररोज ३ हजार पोती असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६,४०० ते ७,१५१ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. अर्थसंकल्पातील जीएसटीच्या नियमांतील नव्या तरतुदींमुळे उद्योजक, व्यापारी, सीए, कर सल्लागार आदी सर्वच जण धास्तावले आहेत. टॅक्स चोरी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटमधील घोटाळे थांबवण्यासाठी शासनाने ज्या उपाययोजना अवलंबिल्या आहेत, त्या जाचक असल्याचे बहुतांश करदात्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोती असून, १०० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४,५५० ते ४,६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, दर ४९,२०० रुपये प्रतितोळा आहे. चांदीचा दर स्थिर म्हणजे ७१,५०० रुपये प्रतिकिलो असा आहे.