शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

जिल्हावासियांसाठी जालना महोत्सव ठरणार पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:48 IST

जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे महोत्सवाचे उत्तम नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.शहरात १८ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जालना महोत्सव २०१८ च्या पूर्वतयारीनिमित्त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, प्रभारी जिल्हाधिकारी पी. बी. खपले, पोलीस अधीक्षम रामनाथ पोकळे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उद्योजक घनशाम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, गोविंदप्रसाद मुंदडा, सुदेश करवा, वीरेंद्र धोका यांची प्रमुख उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, मागील अनेक वर्षांनतर शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा हा महोत्सवाचा उद्देश आहे. सर्व जाती-धर्माच्या गुरुंना महोत्सवात सहभागी करुन घेत आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ होणे अपेक्षित आहे. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जगाच्यापाठीवरील कलाकृतींची महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हावासियांना ओळख होणार आहे.स्थानिक कलावंतांना यातून चांगली संधी मिळेल. महोत्सवाचा लाभ जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही घेता यावा यासाठी महोत्सवाच्या प्रचार, प्रसारावर भर देण्यासाठी समाजमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग करण्याची सूचना त्यांनी केल्या.अन्य उपस्थितांनी या वेळी आपल्या सूचना मांडल्या. वीरेंद्र धोका यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. फड यांनी आभार मानले. बैठकीस महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalanaजालना