शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

...तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:21 IST

राजेश भिसे। लोकमत न्यूज नेटवर्क विघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ...

राजेश भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कविघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यास हा घटकही तेवढाच जबाबदार असून, प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा लढा मंत्रालयापासून सुरू झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सकारात्मक पावले उचलली असली, तरी जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासह जनावरांचेही आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल.आजकाल सर्वत्र कुठलीही वस्तू वापरण्यासाठी म्हणा वा तिच्या वाहतुकीसाठी सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लास्टिक वेस्टमुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वीच पर्यावरण तज्ज्ञांनी प्लास्टिक वापराबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, याकडे कुणी गांभीर्याने पाहिले नाही. म्हणूनच ही समस्या आज अतिशय गंभीर बनली आहे. प्लास्टिक कचºयासह ई-कचराही सर्वांसाठीच डोकेदु:खी ठरत आहे. प्लास्टिकच्या अनेक वस्तू मानवी आरोग्याला घातक ठरत आहेत. पण त्याच्या जनजागृतीकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्याने प्लास्टिकचा वापर हा अव्याहतपणे सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पाण्याच्या बॉटल्सवर बंदी घातली. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा हा नारा मंत्रालयापासून सुरु झाला असून, तो संपूर्ण महाराष्ट्रात नेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तुच्या पॅकिंगसाठी आज प्लास्टिकचा बिनबोभाटपणे वापर होत आहे. तो मानवी आरोग्यास धोकादायक आहे. पण शासकीय यंत्रणांचे याकडे फारसे लक्ष नसल्याने पर्यावरणासह मानवी जिवन धोक्यात आले आहे.जालना शहर आणि जिल्ह्याचा विचार करता पर्यावरण प्रदूषण निर्माण करण्यात पाणी बॉटल्स असो वा पाणी पाऊच हे घटक धोकादायक ठरत आहेत. आजघडीला शहरात पाणीपाऊच तयार करणाºया किमान पाच ते सहा कंपन्या आहेत. कुठल्याही हॉटेलमध्ये चहासाठी ग्राहक आला तरी पिण्याच्या पाण्याचे पाऊच समोर ठेवले जाते. ९० टक्के आजारांचे मूळ अशुद्ध पाणी असल्याने नागरिकही धोका पत्करत नाहीत. म्हणूनच पाण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस कोटींची उड्डाणे घेत आहे. शहरात कुठेही फेरफेटका मारला तर पाण्याचे रिकामे पाऊच रस्त्याच्या कडेला अस्तावस्तपणे पडलेले आढळून येतात. कालांतराने गायी वा इतर जनावरे हे पाऊच खातात आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मैत्र मांदियाळी यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिकमुक्त जालना शहरासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांमध्येही पर्यावरण बचावासाठी सकारात्मक भूमिका नसल्याने सध्या तरी याला यश येताना दिसून येत नाही.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा संकल्प केला तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होऊ शकेल. अन्यथा एक दिवस मानवी आरोग्यही धोक्यात येऊन नवनवीन आजारांना निमंत्रण मिळणार आहे. म्हणूनच सावध ऐका पुढल्या हाका....असे म्हटले तर वावगे ठरु नये.