शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार

By विजय मुंडे  | Updated: December 15, 2023 20:19 IST

दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

जालना : प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी खरीप पिकांची सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ती सरासरी ४७.६ पैसे दाखविण्यात आली आहे. यात खरिपातील ५१५ व रब्बीच्या ४५६, अशा एकूण ९७१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली; परंतु पिकांची वाढ होताना वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. कमी पावसाचा परिणाम हा रब्बीतील पिकांवरही झाला आहे. प्रशासनाच्या वतीने खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यातून पिकांची उत्पादकता समोर येते. प्रशासकीय पातळीवरून जाहीर होणारी ही पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली, तर दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी मोठी मदत होते. खरीप हंगामाला बसलेला फटका पाहता शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला; परंतु काही तालुके त्यातून वगळण्यात आली होती.

आता खरिपाची सुधारित अंतिम पैसेवारीच ५० पैशांच्या खाली असल्याने इतर तालुक्यांतील शेतकरी, नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. परतूर तालुक्यातील एकूण ९८ गावांपैकी राणी वाहेगाव हे एक गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे ९७ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रशासकीय पातळीवरून अंतिम पैसेवारी जाहीर झाली असली तरी आता शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लागू होणाऱ्या सवलती आदी बाबींकडे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.

...अशी आहे तालुकानिहाय स्थितीतालुका- गावे- पैसेवारीजालना- १५१- ४७बदनापूर- ९२- ४५.९७भोकरदन- १५७- ४४.२४जाफराबाद- १०१- ४८.२१परतूर- ९७- ४७.०८मंठा- ११७- ४६.४३अंबड- १३८- ४९.९घनसावंगी- ११८- ४८.४३एकूण- ९७१- ४७.०६

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र