शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार

By विजय मुंडे  | Updated: December 15, 2023 20:19 IST

दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

जालना : प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी खरीप पिकांची सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ती सरासरी ४७.६ पैसे दाखविण्यात आली आहे. यात खरिपातील ५१५ व रब्बीच्या ४५६, अशा एकूण ९७१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली; परंतु पिकांची वाढ होताना वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. कमी पावसाचा परिणाम हा रब्बीतील पिकांवरही झाला आहे. प्रशासनाच्या वतीने खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यातून पिकांची उत्पादकता समोर येते. प्रशासकीय पातळीवरून जाहीर होणारी ही पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली, तर दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी मोठी मदत होते. खरीप हंगामाला बसलेला फटका पाहता शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला; परंतु काही तालुके त्यातून वगळण्यात आली होती.

आता खरिपाची सुधारित अंतिम पैसेवारीच ५० पैशांच्या खाली असल्याने इतर तालुक्यांतील शेतकरी, नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. परतूर तालुक्यातील एकूण ९८ गावांपैकी राणी वाहेगाव हे एक गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे ९७ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रशासकीय पातळीवरून अंतिम पैसेवारी जाहीर झाली असली तरी आता शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लागू होणाऱ्या सवलती आदी बाबींकडे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.

...अशी आहे तालुकानिहाय स्थितीतालुका- गावे- पैसेवारीजालना- १५१- ४७बदनापूर- ९२- ४५.९७भोकरदन- १५७- ४४.२४जाफराबाद- १०१- ४८.२१परतूर- ९७- ४७.०८मंठा- ११७- ४६.४३अंबड- १३८- ४९.९घनसावंगी- ११८- ४८.४३एकूण- ९७१- ४७.०६

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र