शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जालना जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:14 IST

बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना हे एक मोठे व्यापारी केंद्र असल्याने येथे दररोज कोट्यवधी रूपयांचे बँकेचे व्यवहार होतात.मात्र बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संपाचा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यानुसार बुधवारी बँका उघडल्या मात्र, तेथील व्यवहार ठप्प झाले होते. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएममध्ये खडखडाट होता. जालना जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८ पेक्षा अधिक शाखा आहेत. त्या सर्व शाखांमध्ये आज बंद पाळण्यात आला.या राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँका सुरू असून, कुठलाच उपयोग झाला नाही. सर्व बँकांचे आलेले धनादेश हे राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या जुन्या हैदराबाद बँकेत क्लिअरिंगसाठी पाठविले जातात. परंतु आजच्या संपामुळे क्लिअरिंगची व्यवस्थाच बंद असल्याने हे धनादेश सहकारी बँकेत तसेच पडून होते. सहकारी बँकेत केवळ रोखीने रक्कम स्वीकारण्याचे व्यवहार सुरळीत पार पडल्याची माहिती सहकारी बँकेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.एकूणच सरकारने बँकांचे विलिनीकरण केल्यावर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्या तुलनेत बँकांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असून, कंत्राटी पध्दतीने भरतीला प्राधान्य दिले जात आहे.तसेच बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे, बँक अधिकारी कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करणे यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे बँक कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी देहेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंप