शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घाणेगाव ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:56 IST

वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आंदोलकांची समजूत घालत संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. चार तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना काही वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आलेला आहे. या गावातील नागरिकांना जांब समर्थ येथील सोसायटीमार्फत संलग्न दुकानातून स्वस्त धान्य वाटप केले जाते. सोसायटीचे धान्य वाटप मात्र परवाना निलंबित असलेल्या जुन्याच विक्रेत्याकडून केले जात आहे. त्यामुळे गावातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त महिला व पुरुष सकाळी गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जांबसमर्थ तलाजवळ पोहोचले. सर्वांनी तलावाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास पाण्यातच जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार अश्विनी डमरे, घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुळसीदास धुमाळ, नायब तहसीलदार गणेश पोलास, पेशकर मोरे, मंडळाधिकारी एस.बेले, तलाठी थालके, लिपिक सुशील जाधव आदी दुपारी एक वाजता जांबसमर्थ तलाव परिसरात पोहोचले. अंबड अग्निशमन दलाच्या पथकाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आली. तहसीलदार डमरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई करण्यासह आंदोलन कर्त्यांच्या अडचणी सोडविण्याचे लेखी लिहून दिले. त्यानंतर चार तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.