शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जालन्यात वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:15 IST

जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे.

जालना :  जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

जुना जालन्यातील गांधीचमन ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी थेट ताजा भाजीपला विक्रीसाठी आणतात. शेतकरी योग्य दरात भाजीपाला देत असल्याने  शहरातील नोकरदार वर्ग शेतकऱ्यां कडून भाजीपाला खरेदीस प्राधान्य देतात. स्थानिक विक्रेतेही नेहमीच्या ठिकाणांऐजवी रविवारी बाजारात भाजीपाला विक्री करतात. सुमारे चारशेंवर विक्रेते या बाजारा भाजीपाला, किराणा, फळे व अन्य साहित्य विक्री करतात. अनेकदा स्थानिक विक्रेते शेतकऱ्यासोबत जागेवरून वाद घालतात. मोक्याच्या जागी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी जागा मिळेल तिथे बसतात. असे असतानाही नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विक्रेत्यांकडून ठेकेदारामार्फत तीस रुपये बाजार भाडेपट्टी वसुली केली जाते.

ठेकेदामार्फत वसुलीसाठी बाजारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बहुतांश शेतकरी विक्रेत्यांना कुठलीही पावती न देता तीस रुपये घेतले जातात. भाडेपट्टीची वसुली करणाऱ्या विक्रेत्याचे नाव पावतीवर टाकले जात नाही. याबाबत विचारणा केल्यास वसुलीसाठी येणारे कर्मचारी दमदाटी करतात. उगाच वाद नको म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी निमूटपणे पैसे देतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लालबाग परिसरात बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही अशाच पद्धतीने लूट सुरू आहे.

मग वसुली कशी ?रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार अनधिकृत असल्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. सुरुवातीला नगरपालिका क्रीडा संकुलात भरणारा हा बाजार अनधिकृत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने उठवून दिला होता. बाजार अनधिकृतरीत्या भरवला जात असेल तर मग ठेकेदारामार्फत भाडेपट्टी वसुली कशी केली जाते, अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

भाडेपट्टी वसूल केली जावू नयेशेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरूच आहे.त्यामुळे शहरातील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुठलीही भाडेपट्टी वसूल केली जावू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पावती न देता वसुली करणे हा प्रकार गंभीर असून, याबाबत चौकशी व्हायला हवी.- बाला परदेशी, नगरसेवक, शिवसेना

करार रद्द केला जाईलरविवार बाजारात वार्षिक करार पद्धतीने भाडेपट्टी वसुलीचा ठेका दिला जातो. मात्र, ठेकेदाराकडून पावती न देताच वसुली केली जात असेल तर हा प्रकार चुकीचा आहे. याबाबत  तक्रार प्राप्त झाल्यास ठेकेदाराचा वार्षिक करार रद्द केला जाईल.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी नगरपालिका.

टॅग्स :MarketबाजारJalanaजालनाTaxकर