शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळणे हे माझे भाग्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:30 IST

२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.वक्तृत्वाची आवड कशी निर्माण झाली ?वक्तृत्वाची आवड अगदी लहानपणचीच. ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयात असताना प्रत्येक नेत्यांची जयंती असो की, २६ जानेवारी, १५ आॅगस्ट सारखे राष्ट्रीय उत्सव. भाषण करण्याला माझे प्रथम प्राधान्य असायचे. वडिलांना पुस्तक वाचनाची आवड असल्याने घरी पुस्तकांचे ग्रंथालयच आहे. मलाही ती आवड जडली. पुस्तक वाचता-वाचता कुठे तरी आपल्याकडच्या वाचलेल्या ज्ञानाची देवाण - घेवाण व्हावी या उद्देशाने वक्तृत्वामधील माझा आत्मविश्वास वाढला आणि जेईएस महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेताना ती आवड जपली. माझ्या वक्तृत्वामध्ये मी स्वत: बदल घडवले. म्हणून आजचे यश संपादन करू शकले.जालना ते मलेशियापर्यंतचा प्रवास कसा राहिला ?आई- वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि महाविद्यालयाच्या मदतीने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धा करू लागले. त्यामध्ये यश-अपयशही मिळत गेले. त्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय युवा संसद २०१९ या मोठ्या यशानंतर सुवर्णसंधी आली. ती मलेशिया येथे नुकतीच पार पडलेल्या आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषदेची.तुमचा नवीन वक्ते युवकांसाठी संदेश काय राहील ?नवीन वक्त्यांसाठी एकच सल्ला राहिल. स्पर्धेत क्रमांक येत नाही म्हणून स्पर्धा करणं सोडू नका. प्रयत्न करत राहा, जिद्द ठेवा, स्वत:तील उणीवा ओळखा व त्यावर काम करायला सुरुवात करा. यश नक्कीच येईल.तुम्ही निवडलेलं क्षेत्र कोणतेही असो कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक त्यात तुमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा. त्यात एक दिवस तुम्हाला नक्कीच यश येईल. माझ्या आई - वडिलांनी मला पाठिंबा व पोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकांनी मुलींना पोत्साहन दिले पाहिजे.अनोखा अनुभवमलेशिया येथे आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. जगभरातील युवा नेत्यांशी संवाद साधता आला. जागतिक समस्या आणि त्यावर उपाययोजना काढण्यात आल्या. एकंदरीत चार दिवसांचा अनुभव नवीन जग शिकवून गेला. विकसित देशांमधील आणि आपल्या भारतामधील फरक या परिषदेतून समोर आला. आपण सुद्धा विकसित होऊ शकतो गरज आहे ती देशाला प्रथम प्राधान्य देण्याची.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJalanaजालना