शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळणे हे माझे भाग्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:30 IST

२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.वक्तृत्वाची आवड कशी निर्माण झाली ?वक्तृत्वाची आवड अगदी लहानपणचीच. ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयात असताना प्रत्येक नेत्यांची जयंती असो की, २६ जानेवारी, १५ आॅगस्ट सारखे राष्ट्रीय उत्सव. भाषण करण्याला माझे प्रथम प्राधान्य असायचे. वडिलांना पुस्तक वाचनाची आवड असल्याने घरी पुस्तकांचे ग्रंथालयच आहे. मलाही ती आवड जडली. पुस्तक वाचता-वाचता कुठे तरी आपल्याकडच्या वाचलेल्या ज्ञानाची देवाण - घेवाण व्हावी या उद्देशाने वक्तृत्वामधील माझा आत्मविश्वास वाढला आणि जेईएस महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेताना ती आवड जपली. माझ्या वक्तृत्वामध्ये मी स्वत: बदल घडवले. म्हणून आजचे यश संपादन करू शकले.जालना ते मलेशियापर्यंतचा प्रवास कसा राहिला ?आई- वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि महाविद्यालयाच्या मदतीने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धा करू लागले. त्यामध्ये यश-अपयशही मिळत गेले. त्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय युवा संसद २०१९ या मोठ्या यशानंतर सुवर्णसंधी आली. ती मलेशिया येथे नुकतीच पार पडलेल्या आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषदेची.तुमचा नवीन वक्ते युवकांसाठी संदेश काय राहील ?नवीन वक्त्यांसाठी एकच सल्ला राहिल. स्पर्धेत क्रमांक येत नाही म्हणून स्पर्धा करणं सोडू नका. प्रयत्न करत राहा, जिद्द ठेवा, स्वत:तील उणीवा ओळखा व त्यावर काम करायला सुरुवात करा. यश नक्कीच येईल.तुम्ही निवडलेलं क्षेत्र कोणतेही असो कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक त्यात तुमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा. त्यात एक दिवस तुम्हाला नक्कीच यश येईल. माझ्या आई - वडिलांनी मला पाठिंबा व पोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकांनी मुलींना पोत्साहन दिले पाहिजे.अनोखा अनुभवमलेशिया येथे आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. जगभरातील युवा नेत्यांशी संवाद साधता आला. जागतिक समस्या आणि त्यावर उपाययोजना काढण्यात आल्या. एकंदरीत चार दिवसांचा अनुभव नवीन जग शिकवून गेला. विकसित देशांमधील आणि आपल्या भारतामधील फरक या परिषदेतून समोर आला. आपण सुद्धा विकसित होऊ शकतो गरज आहे ती देशाला प्रथम प्राधान्य देण्याची.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJalanaजालना