शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बिनविरोध निवडणुकीचा विषय पडतोय बाजूला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

अनेक ठिकाणी तरुण युवक निवडणुकीच्या मैदानात टेंभुर्णी परिसरात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका टेंभुर्णी : सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण ...

अनेक ठिकाणी तरुण युवक निवडणुकीच्या मैदानात

टेंभुर्णी परिसरात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

टेंभुर्णी : सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापत असून, प्रत्येकजण आखाड्यात दंड थोपटू लागल्याने बिनविरोध निवडणुकीचा विषय बाजुला पडताना दिसत आहे. टेंभुर्णी परिसरात तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीसह आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यात टेंभुर्णी- गणेशपूर, दहिगाव, आंबेगाव, अकोलादेव, तपोवन- निमखेडा, शिराळा- वाढोणा, सातेफळ, डोणगाव या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

शासनपातळीवरून बिनविरोध निवडणुकीसाठी गावांना विकासनिधी उपलब्ध करून दिला जात असला तरी परिसरात बुधवारपासून आवेदनपत्र भरणे सुरू झाले तरी कुठल्याच गावात बिनविरोध निवडणुकीसाठी ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसत नाही. यावर्षीच्या निवडणुकीत अनेक गावात तरुण युवक निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने गावागावात निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. यामुळे गावातील जेष्ठ राजकारण्यांनी बिनविरोध निवडणुकीचा विषय मांडला तरी तरुणांकडून तो उधळून लावला जात असल्याचेही चित्र काही गावांत दिसू लागले आहे. यामुळे आता बिनविरोध निवडणुकीचा विषय बाजूला ठेवून तु तिकडून तर मी इकडून म्हणत अनेकजण एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असल्याने ग्रामपंचायतीचा आखाडा चांगलाच गाजणार असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय इच्छाशक्तींंचा पुढाकार गरजेचा

अद्याप आवेदनपत्र भरणे सुरू झाले असले तरी अजून आवेदनपत्र मागे घेण्यासाठी सात दिवसांचा अवकाश आहे. तोपर्यंत जर गावागावात बैठकी घेवून बिनविरोधसाठी पुढाकार घेतला तर काही गावे तरी बिनविरोध निघतील. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

शंकरराव देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, दहिगाव.

पुढाकार घेतला पण प्रतिसाद नाही

मावळत्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद माझ्याकडे होते. निवडणुकीमुळे गाव गटा- तटात विभागले जाते. हे तंटे गावाला पुढील पाच वर्षे तर काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या पुरतात. म्हणून या निवडणुकीत मी बिनविरोध साठी पुढाकार घेतला. स्वत:हून विरोधी पैनलला जावून भेटलो. त्यांना सरपंच पदाचीही ऑफर दिली. परंतु, तरीही हा प्रस्ताव उधळून लावण्यात आला. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे.

ॲड. रामकृष्ण बनकर, मावळते सरपंच, सातेफळ.

या निवडणुकीसाठी मी गावातील तरुणांना एकत्रित करून पैनल तयार केले आहे. प्रत्येकाची निवडणूक लढण्याची पहिलीच वेळ असल्याने प्रत्येकजण उत्साही आहे. मात्र गावचा विकास करणारी चांगली माणसे पुढे येत असतील तर बिनविरोधसाठीही आमची तयारी आहे. फक्त त्यात योग्य प्रमाणात तरुणांनाही संधी मिळाली पाहिजे.

विशाल फलके, युवा कार्यकर्ता, तपोवन गोंधन.