शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

सिंचन विहीर, बोंडअळीने सभा गाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:16 IST

गटविकास अधिकाºयांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून अधिकच्या सिंचन विहिरींना मान्यता दिली. शेतकºयांनी उसनवारी करून विहिरी खोदल्या. आता त्यांना पैसे मिळणार कसे, असा सवाल जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा : आठ विषयांना सभागृहाची मंजुरी, वार्षिक प्रशासन अहवालावर सदस्यांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गटविकास अधिकाºयांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून अधिकच्या सिंचन विहिरींना मान्यता दिली. शेतकºयांनी उसनवारी करून विहिरी खोदल्या. आता त्यांना पैसे मिळणार कसे, असा सवाल जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. तसेच बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी ठराव घ्या. संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिंचन विहिरी आणि बोंडअळीने आजची सभा गाजली.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण, उप मुख्यकार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ वार्षिक प्रशासन अहवालास मान्यता देण्याच्या मुद्यावर विरोधी सदस्य राहुल लोणीकर, शालिग्राम म्हस्के यांनी आक्षेप घेतला. अहवालात काय नमूद आहे. याबाबत कुठलीच माहिती नसल्याने पुढच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. प्रशासन अहवालात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती असून, तो शासनास सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे चार दिवस अभ्यास करून त्यास मान्यता द्यावी, असे अध्यक्ष खोतकर यांनी सूचविले. सिंचन विहिरींच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्य बाप्पासाहेब गोल्डे यांनी केली. या चर्चेत जयमंगल जाधव, राहुल लोणीकर यांनीही सहभाग घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. ज्या गटविकास अधिकाºयांनी अधिकच्या विहिरींना मान्यता दिली. त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष खोतकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना दिली.सदस्य गणेश फुके यांनी बोंडअळीचा मुद्दा उपस्थित केला. या संकटामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करावे. तसेच संबंधित सीडस् कंपन्यांवर गुन्हे दाखल करून बाधितांना मदत देण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन शासनास सादर करावा, अशी मागणी सभागृहात सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी केली. बोंडअळीने बाधित शेतकºयांना जी फार्म भरण्यास सांगितले जात आहे, मात्र त्यासाठी कृषिसेवा केंद्राची पावती आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रचालकांना हेतुपुरस्सर त्रास देऊ नये. या पूर्वी कीटकनाशकांच्या तपासणीत अनियमितता आढळलेल्या कृषिसेवा केंद्रचालकांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले. मात्र, त्यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी केला. समाजकल्याण विभागांतर्गत मागील वर्षीची १२ कोटी व या वर्षी २० कोटींची कामे होणार आहे. या निधीचे सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे, अशी मागणी लोणीकर यांनी केली. मात्र, गत वर्षीच्या १२ कोटींची निधीचे नियोजन झाले असून, तो तीन महिन्यांत खर्च करायचा असल्याने त्यात आता बदल अशक्य आहे. उर्वरीत वीस कोटींच्या निधीचे समान नियोजन केले जाईल, असा खुलासा उपाध्यक्ष टोपे यांनी केला. अवधूत खडके यांच्यासह अन्य सदस्यांनी सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला.