शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सिंचन विहीर, बोंडअळीने सभा गाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:16 IST

गटविकास अधिकाºयांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून अधिकच्या सिंचन विहिरींना मान्यता दिली. शेतकºयांनी उसनवारी करून विहिरी खोदल्या. आता त्यांना पैसे मिळणार कसे, असा सवाल जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा : आठ विषयांना सभागृहाची मंजुरी, वार्षिक प्रशासन अहवालावर सदस्यांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गटविकास अधिकाºयांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून अधिकच्या सिंचन विहिरींना मान्यता दिली. शेतकºयांनी उसनवारी करून विहिरी खोदल्या. आता त्यांना पैसे मिळणार कसे, असा सवाल जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. तसेच बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी ठराव घ्या. संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिंचन विहिरी आणि बोंडअळीने आजची सभा गाजली.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण, उप मुख्यकार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ वार्षिक प्रशासन अहवालास मान्यता देण्याच्या मुद्यावर विरोधी सदस्य राहुल लोणीकर, शालिग्राम म्हस्के यांनी आक्षेप घेतला. अहवालात काय नमूद आहे. याबाबत कुठलीच माहिती नसल्याने पुढच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. प्रशासन अहवालात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती असून, तो शासनास सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे चार दिवस अभ्यास करून त्यास मान्यता द्यावी, असे अध्यक्ष खोतकर यांनी सूचविले. सिंचन विहिरींच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्य बाप्पासाहेब गोल्डे यांनी केली. या चर्चेत जयमंगल जाधव, राहुल लोणीकर यांनीही सहभाग घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. ज्या गटविकास अधिकाºयांनी अधिकच्या विहिरींना मान्यता दिली. त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष खोतकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना दिली.सदस्य गणेश फुके यांनी बोंडअळीचा मुद्दा उपस्थित केला. या संकटामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करावे. तसेच संबंधित सीडस् कंपन्यांवर गुन्हे दाखल करून बाधितांना मदत देण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन शासनास सादर करावा, अशी मागणी सभागृहात सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी केली. बोंडअळीने बाधित शेतकºयांना जी फार्म भरण्यास सांगितले जात आहे, मात्र त्यासाठी कृषिसेवा केंद्राची पावती आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रचालकांना हेतुपुरस्सर त्रास देऊ नये. या पूर्वी कीटकनाशकांच्या तपासणीत अनियमितता आढळलेल्या कृषिसेवा केंद्रचालकांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले. मात्र, त्यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी केला. समाजकल्याण विभागांतर्गत मागील वर्षीची १२ कोटी व या वर्षी २० कोटींची कामे होणार आहे. या निधीचे सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे, अशी मागणी लोणीकर यांनी केली. मात्र, गत वर्षीच्या १२ कोटींची निधीचे नियोजन झाले असून, तो तीन महिन्यांत खर्च करायचा असल्याने त्यात आता बदल अशक्य आहे. उर्वरीत वीस कोटींच्या निधीचे समान नियोजन केले जाईल, असा खुलासा उपाध्यक्ष टोपे यांनी केला. अवधूत खडके यांच्यासह अन्य सदस्यांनी सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला.